शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 18:36 IST

पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही.

ठळक मुद्देफळबागांचे नुकसान : मुलांच्या अंगावर दिसतायत लालसर चट्टे तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार

पुणे : पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच विहिरींचा पाणीसाठाही आटू लागला आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. मात्र, तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही. परंतु , या फेसाळलेल्या दूषित पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतातील पेरू, सिताफळ आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.      पिंपळे (ता. पुरंदर) येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पेरू, सिताफळ आणि आंब्याचे पीक घेत आहेत. फळबागांसाठी या दोन्ही शेतकऱ्यांनी साडेसहा एकर क्षेत्रात सामूहिक विहीर तयार केली आहे. त्याच विहिरीवर हे दोन्हीही शेतकरी आपल्या बागांना पाणी देतात. मात्र, २ दिवसांपूर्वी अनंता क्षीरसागर हे पहाटे फळबागांना पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना अचानक विहिरीतील पाण्यावर फेस आल्याचे दिसले. त्या वेळी त्यांना या फेसामागचे गूढ उकलले नाही. त्यांनी विहिरीतील हेच फेसाळलेले पाणी पेरू, सीताफळ आणि आंब्याच्या बागांना दिले, त्यामुळे या दूषित पाण्यामुळे संपूर्ण पीक पिवळे पडून जळायला लागले आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे या शेतकऱ्यांच्या घरातील महिला आणि लहान मुलांच्या अंगावर लालसर चट्टे पडून त्यांंना त्वचेचे विकार जडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शेतातील पिकांसोबत जनावरांनाही या दूषित पाण्याचा त्रास होत आहे.विहिरीत कुणीतरी विषारी औषध टाकल्याचा संशय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यापूर्वीही या शेतकऱ्यांच्या शेतातील वीजवाहक वायर कापून वीज खंडित करण्याचा काही अज्ञातांनी प्रयत्न केला होता.शिवाय काढणीला आलेल्या गव्हाच्या पेंढीत छोटे दगड ठेवून त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता, त्या वेळी या शेतकऱ्यांनी या दोन्ही घटनांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र त्यांनी यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनंता क्षीरसागर व विठ्ठल खेनट यांंनी केली आहे. 

....................................

याबाबत तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार असून, नुकसानीनुसार त्यांना मदत दिली जाईल. तसेच दूषित पाण्याचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.  - देवेन्द्र ढगे, तालुका कृषि अधिकारी,पुरंदर 

टॅग्स :PurandarपुरंदरWaterपाणीFarmerशेतकरी