शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 18:36 IST

पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही.

ठळक मुद्देफळबागांचे नुकसान : मुलांच्या अंगावर दिसतायत लालसर चट्टे तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार

पुणे : पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच विहिरींचा पाणीसाठाही आटू लागला आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. मात्र, तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही. परंतु , या फेसाळलेल्या दूषित पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतातील पेरू, सिताफळ आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.      पिंपळे (ता. पुरंदर) येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पेरू, सिताफळ आणि आंब्याचे पीक घेत आहेत. फळबागांसाठी या दोन्ही शेतकऱ्यांनी साडेसहा एकर क्षेत्रात सामूहिक विहीर तयार केली आहे. त्याच विहिरीवर हे दोन्हीही शेतकरी आपल्या बागांना पाणी देतात. मात्र, २ दिवसांपूर्वी अनंता क्षीरसागर हे पहाटे फळबागांना पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना अचानक विहिरीतील पाण्यावर फेस आल्याचे दिसले. त्या वेळी त्यांना या फेसामागचे गूढ उकलले नाही. त्यांनी विहिरीतील हेच फेसाळलेले पाणी पेरू, सीताफळ आणि आंब्याच्या बागांना दिले, त्यामुळे या दूषित पाण्यामुळे संपूर्ण पीक पिवळे पडून जळायला लागले आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे या शेतकऱ्यांच्या घरातील महिला आणि लहान मुलांच्या अंगावर लालसर चट्टे पडून त्यांंना त्वचेचे विकार जडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शेतातील पिकांसोबत जनावरांनाही या दूषित पाण्याचा त्रास होत आहे.विहिरीत कुणीतरी विषारी औषध टाकल्याचा संशय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यापूर्वीही या शेतकऱ्यांच्या शेतातील वीजवाहक वायर कापून वीज खंडित करण्याचा काही अज्ञातांनी प्रयत्न केला होता.शिवाय काढणीला आलेल्या गव्हाच्या पेंढीत छोटे दगड ठेवून त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता, त्या वेळी या शेतकऱ्यांनी या दोन्ही घटनांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र त्यांनी यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनंता क्षीरसागर व विठ्ठल खेनट यांंनी केली आहे. 

....................................

याबाबत तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार असून, नुकसानीनुसार त्यांना मदत दिली जाईल. तसेच दूषित पाण्याचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.  - देवेन्द्र ढगे, तालुका कृषि अधिकारी,पुरंदर 

टॅग्स :PurandarपुरंदरWaterपाणीFarmerशेतकरी