शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

देहूत नाठाळांना पायघड्या कशासाठी? धीरेंद्र शास्त्रींच्या देहू दर्शनानंतर वारकऱ्यांच्या सवाल

By विश्वास मोरे | Updated: November 24, 2023 10:15 IST

भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणो काठी... यानुसार नाठाळावर प्रहार केला....

पिंपरी : बागेश्वर धामाचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्यावर टीका केली होती. त्या बागेश्वर महाराजांना देहूतील मंदिरात पायघड्या घातल्या. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणो काठी... यानुसार नाठाळावर प्रहार केला. संत सूर्यावर टीका करणाऱ्या शास्त्री महाराजांना संत तुकाराम महाराजांच्या भूमीतच पायघड्या घेतल्या. याबाबत वारकरी संप्रदायातून टीका होत आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे चारित्र्य हणन करण्याचे काम बागेश्वर धामाचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी  केले होते. बागेश्वर शास्त्री महाराज पुण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने वारकरी संप्रदाय आणि संघटना यांनी टीका केली. तसेच  धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या टीकेचा समाचार संत तुकाराम महाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार महाराजांचे दहावे वंशज ह भ प संभाजी महाराज देहूकर यांनी घेतला.

मती भ्रष्ट आणि क्रिया नष्ट भोंदूबाबा उर्फ बागेश्वर शास्त्री यांच्या अध्यात्मिक उचापती सुरू आहेत, संत आणि संत चरित्रांची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी, भ्रमिष्ट, निंदक तुकोबारायांच्या वेळेला होते.आकाशा एवढ्या विश्वव्यापक चरित्रावर थुंकण्याचा संतापजनक वेडेपणा करून आपल्या भोगेश्वरी संतपणाचे दिवाळी काढले आहे, असा समाचार मोरे महाराज यांनी घेतला होता.काय टीका केली?

संत तुकाराम महाराज यांना त्याची पत्नी जिजाऊ या दररोज काठीने मारत होत्या, त्यावर एकाने विचारले. बायकोकडून मार खाता लाज वाटत नाही का, त्यावर तुकाराम महाराज त्या व्यक्तीस म्हणाले, मारणारी बायको मिळाली म्हणून मी इथपर्यंत आलो. प्रेम करणारी बायको मिळाली असती तर ईश्वरापर्यंत पोहोचता आले असते का, असे विधान एका प्रवचनात बागेश्वर शास्त्री महाराज यांनी केले होते.

पायघड्या घालण्याचे कारण काय?

साहित्यिक आनंद यादव यांनी संतसूर्य या कादंबरीत तुकोबारायांच्या चारित्र्यावर टीका केली होती. वारकऱ्यांनी संताप व्यक्त केल्याने यादव यांना कादंबरी मागे घ्यायला लागली होती. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवता आले नव्हते. त्यानंतर बागेश्वर महाराजांनी देहूत घातलेल्या पायघड्याबाबत टीका होत आहे. देवस्थानाचे एक माजी अध्यक्ष, दोन माजी सोहळा प्रमुख, एक माजी विश्वस्त उपस्थित होते. तसेच महाराजांना आव्हान देणाऱ्या संभाजी महाराज यांच्या घरी बागेश्वर महाराज देहूत येण्यापूर्वीच पोलीस धडकले होते. दुसरीकडे बागेश्वर महाराजांसाठी पायघड्या घातल्या. दिंडीकाढून स्वागत केले. तुकोबारायांची पगडी गाथा, मूर्ती, उपरणे देऊन स्वागत करण्यात आले.  पायघड्या घालण्याचे कारण काय , असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आकाशाएवढ्या विश्वव्यापक चरित्रावर थुंकण्याचा संतापजनक वेडेपणा बागेश्वर शास्त्री महाराज यांनी करून आपल्या भोगेश्वरी संतपणाचे दिवाळी काढले आहे. अशा महाराजांचे देहूत जे स्वागत केले. त्यांना तुकोबारायांची पगडी घातली. दिंडीद्वारे स्वागत केले. नाठाळाच्या माथी हाणो काठी, करायचे सोडून काहींनी लोटांगण घातले. ही बाब तुकोबारायांनाही आवडली नसती.

- संभाजी महाराज देहूकर, वंशज.

बागेश्वरबाबांना जे साहित्य मिळाले, त्यातून तुकोबारायांचे जीवन अभ्यासताना विपर्यास झाला. याबाबत त्यांनी माफी मागितली. गाथा बुडविणारे रामेश्वर भट हे तुकोबारायांचे टाळकरी बनले. एकजण अग्नी झाला, तर दुसयाने पाणी व्हायचे, अशी वारकरी संप्रदायात शिकवण आहे. त्यामुळे कोणी नाराज नाही. आम्हीही त्यांना माफ केले आहे.

-नितीन महाराज मोरे, माजी अध्यक्ष

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामdehuदेहूvarkariवारकरीPuneपुणे