शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा उमेदवारांचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा अयोगाने (एमपीएससी) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र मराठा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यासाठीचे नव्हते. मराठा आरक्षणाच्या ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा अयोगाने (एमपीएससी) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र मराठा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यासाठीचे नव्हते. मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार लावण्यात आलेल्या निकालात एसईबीसी वगळून आयोगाने निकाल सादर करणे अपेक्षित आहे का, यावर न्यायालयाचे मार्गदर्शन व अंतरिम आदेश मिळवण्यासाठी एमपीएससीने ऑक्टोबर २०२० मध्येच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आयोगातील सूत्रांनी असा दावा ‘लोकमत’शी बोलताना केला.

न्यायालयाने ९ सप्टेंबरला दिलेल्या निकालात आरक्षणाबाबत स्पष्टता नव्हती. एमपीएससीने मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार २०१९ पर्यंत झालेल्या परीक्षांचे निकाल लावले. कायद्याला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीने निवड यादी सादर करताना एसईबीसीचे आरक्षण वगळून सुधारित निकाल सादर करणे अपेक्षित आहे का? यावर न्यायालयाकडून अंतरिम आदेशाची मागणी केली होती. दरम्यान, मराठा समाजातील नेत्यांनी आणि मराठा संघटनांनी टीकेची झोड उठवल्यानंतर एमपीएससीने न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र माघारी घेतले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ज्या उमेदवारांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केला आहे. त्यांना आता २३ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार ईडब्लूएस किंवा खुला यातून आरक्षण घेता येऊ शकणार आहे. त्यामुळे एमपीएससीने ज्याबाबत अंतरिम आदेशाची मागणी केली होती. ती मागणीच संपुष्टात आली. त्यामुळे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राला काहीही अर्थ राहिलेला नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे.

एमपीएससीला नियुक्ती देण्याचा अधिकार नाही. एमपीएससी शासनकडून रिक्त जागांच्या मागणीपत्राची मागणी करते. जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबविते. अंतिम यादी तयार करून केवळ संबंधित पदांसाठी उमेदवाराची निवड करून ती यादी राज्य शासनाला सादर करते. त्यामुळे निवड प्रक्रिया राबविण्यापर्यंतचे अधिकार एमपीएससीला आहेत. नियुक्तीचे सर्व अधिकार राज्यसरकारला असून यात एमपीएससी हस्तक्षेप करीत नाही, असा खुलासा एमपीएससीतल्या सूत्रांनी केला.

राज्य सरकारकडून दिरंगाई?

एमपीएससीने २०१९ पर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचे अंतिम निकाल लावून राज्य सरकारला सादर केले आहेत. त्यामुळे नियुक्ती देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच आहेत. एमपीएससीला नाहीत, याकडेही आयोगातील सूत्रांनी लक्ष वेधले. त्यामुळे या प्रकरणी महाआघाडी सरकार विलंब लावत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

टांगती तलवार कायम

एमपीएससीकडून २०२० नंतर ज्या नियोजित परीक्षा घेण्यात येणार होत्या किंवा येणार आहेत त्यावर न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या मराठा आरक्षणाचा विचार करता पुढील परीक्षांना मराठा आरक्षण ग्राह्य धरावे किंवा कसे, यावर न्यायालयातून अंतरिम आदेश मागविण्यासाठी दाखल केलेली याचिका नसून केवळ प्रतिज्ञापत्र आहे, असे आयोगातील सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे मराठा उमेदवारांच्या भवितव्यावरची टांगती तलवार कायम राहिली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात भूमिका घेतली पाहिजे यात आयोगाचा संबंध नाही, असे सूत्रांनी सांगितले.