शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Ashadhi Wari: वाल्हे नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 21:14 IST

वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींचा नगारा, घोडे व माउलींच्या पालखीच्या रथाचे फुलांची उधळण करीत स्वागत केले

वाल्हे : पुराणप्रसिद्ध बोलले वाल्मीक ! नाम तिन्ही लोक उद्धरती! महर्षी वाल्मीकीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फुलांची उधळण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दौंडज येथील विसाव्यानंतर सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. दुपारी दीडच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे नगरीमध्ये पोहोचला यावेळी वरुणराजाने हजेरी लावली व जणू काही पावसाने स्वागत केले.

वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींचा नगारा, घोडे व माउलींच्या पालखीच्या रथाचे फुलांची उधळण करीत स्वागत केले. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वरूप दर्शन दिले होते. तसेच पालखी सोहळ्यात माउलींचे विश्वरूप दर्शन समाज आरतीच्या वेळेस पाहावयास मिळाले. पालखी सोहळा उद्या सकाळी सहा वाजता निरेच्या दिशेने जाणार असून निरा नदी स्नान करून सातार जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.

दुपारीच झाली समाजआरती

त्यानंतर पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या सुकलवाडी रेल्वे गेटच्या मुक्कामी पालखीतळावर दुपारी अडीच वाजता पोहोचला. प्रत्येक ठिकाणी पालखी सोहळाच्या मुक्कामच्या दररोज सायंकाळी समाज आरती घेतली जाते. मात्र वाल्हे येथे पालखी दुपारीच पोचते त्यामुळे पोचताच दुपारी समाज आरती झाली. सोहळ्यात समाज आरतीला विशेष महत्त्व आहे. सोहळ्यातील पुढील सत्तावीस व मागील वीस दिंड्या समाज आरतीसाठी तळावर आल्या. समाज आरतीला हजारोंच्या संख्येने भाविक जमले होते. यावेळी दिंडी समाजाच्या अडचणी विचारात घेऊन गेल्या. समाज आरतीच्या वेळी मध्यभागी माऊलींची पालखी ठेवली गेली व त्याभोवताली गोलाकार हजारो भाविक बसले, तर ४७ दिंड्या उभ्या केल्या गेल्या. पालखीसमोर चोपदार मालक, त्यापुढे वासकर, आळंदीकर, शितोळे सरकारांचे प्रतिनिधी उभे होते.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSocialसामाजिकsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखी