शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:00 IST

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बंद पडणाऱ्या मराठी शाळांना नवसंजीवनी मिळेल..

ठळक मुद्दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

पुणे : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेचे मराठी भाषा अभ्यासकांकडून स्वागत केले जात आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल. समाजात मराठी भाषेचे महत्त्वही अधिक अधोरेखित होईल. बंद पडणाऱ्या मराठी शाळांना नवसंजीवनी मिळेल.परंतु, केवळ घोषणा न करता शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा मराठी भाषेच्या अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मराठी शाळांचे सक्षमीकरण करणे गरजेचे झाले आहे. पालकांकडून मराठी माध्यमाच्या शाळांऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पसंती दिली जात आहे. परंतु, या शाळांमधील काही विद्यार्थ्यांना मराठी लिहिता व वाचता येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे इंग्रजी,उर्दू , हिंदी आदी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्याच्या वक्तव्यामुळे मराठी भाषा अभ्यासकांत व मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, ही घोषणाच राहू नये यासाठी येत्या अधिवेशनात त्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.सदिप सांगळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे एक आशादायी चित्र निर्माण झाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास मराठी भाषिक प्रेमी सत्ताधाºयांचे ॠणी राहतील. भारतीय जनता पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता होती. भाजपने राजकीय इच्छाशक्ती दाखवत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला हवा होता. भाजपला त्याचा राजकीय फायदाही झाला असता. इतर राज्ये त्यांच्या भाषेबद्दल आग्रही असतात. मात्र, आपण आग्रही भूमिका न घेतल्याने मराठी भाषा उपेक्षित राहिली. या निर्णयामुळे इंग्रजी माध्यमाचे अनावश्यक ‘फॅड’ कमी होईल. तसेच इंग्रजी माध्यमात काम करणाºयांना सुध्दा मराठीचे महत्त्व पटेल. खरेतर मराठी विषय पदवी अभ्यासक्रमापर्यंत अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल आणि मराठीला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होईल..........प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या भोवतालच्या समाजाशी जुळवून घेण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. भाषा शिकवणे म्हणजे विद्यार्थ्याला सक्षम करण्यासारखेच आहे. त्यामुळे कोणतीही भाषा कशासाठी शिकवली जात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याशिवाय भाषेची किंमत समजणार नाही. प्रत्येकाला चांगला संवाद साधला आला पाहिजे. त्यासाठी समाजाची भाषा शिकणे आवश्यक आहे. कोणतीही भाषा शाळांमध्ये सक्तीने शिकवली जात नाही तर एक नवी भाषा शिकण्याची संधी आपल्याला मिळत आहे. या दृष्टीकोनातून संबंधित भाषेकडे पाहिले पाहिजे. - डॉ. विद्यागौरी टिळक, माजी मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ......................उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेचे सर्वांकडून स्वागतच केले जात आहे. मराठी शाळांसाठी या निर्णयाची नित्तांत गरज आहे. मराठी ही राजभाषा, लोकभाषा व संवाद भाषा आहे. मराठी भाषा शिकवली जात नसणा-या शाळांमध्ये मराठी शिकवलीच पाहिजे. इतर राज्यांकडून आपल्या भाषेचा नेहमी आग्रह धरला जातो.आपणही मराठीचा आग्रह धरला पाहिजे.यापूर्वीही अशा घोषणा झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही,याचा खेद वाटतो. परंतु,आता या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.- डॉ.न.म.जोशी ,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ.................राज्य शासनाने केवळ दहावीपर्यंत नाही तर बारावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करावा.मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असून त्या बंद पडण्यासाठी खतपाणी घातले जात आहे. शाळा महाविद्यालयातही मराठी ऐवजी संस्कृत किंवा परकीय भाषा घेण्याबाबत काही शिक्षक आग्रह करतात. त्यास विद्यार्थी व पालक बळी पडतात. तसेच इंग्रजी शाळांमधून विद्यार्थ्यांनी घरी इंग्रजीमध्ये संवाद साधावा, असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची मराठी भाषेशी असलेली नाळ तुटते. मागील सरकारने सुध्दा मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती. परंतु, त्याबाबत निर्णय घेतला नाही. या शासनाने ठोस निर्णय घेतला तरच विश्वास ठेवता येईल.- डॉ. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद..........................सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य केला तर त्याचे स्वागतच आहे. परंतु,सध्या मराठी शाळांची स्थिती वाईट आहे.इंग्रजी माध्यमाच्या दहावीतील विद्यार्थ्याला पाच मराठी वाक्य लिहिता येत नाहीत.गेल्या वर्षी सुमारे अडीच ते पाऊणे तीन लाख विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाले.त्यामुळे मराठी विषय योग्य पध्दतीने शिकवण्याबाबत आवश्यक कार्यवाही होणे गरजेची आहे.तसेच नवीन मराठी शाळांना परवानगी देण्याबाबत आणि सध्य असित्वात असणा-या शाळा जगविण्याबबात शासनाने आवश्यक कार्यवाही करावी. - डॉ.अ.ल.देशमुख,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीSchoolशाळाState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार