शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 18:04 IST

संचारबंदीमुळे घरातच कैद होण्यातील तोटे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा तोटा वाढत्या वजनाचा. ते आटोक्यात कसे ठेवावे.याविषयी काही तज्ञांच्या टिप्स....

ठळक मुद्देखाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो

पुणे: कोरोनामुळे लादण्यात आलेल्या संचारबंदीचे तोटे आता पुढे येऊ लागले आहेत. शारीरिक हालचाल बंद आणि खाणे जास्त होऊ लागल्याने वजन वाढले जात अनेकांसमोर ही समस्या निर्माण होत आहे.

फिटनेस तज्ञ मनाली मगर : व्यायाम म्हणजे काही कष्टकरी क्रिया असा अनेकांचा समज आहे. मात्र अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो, ते कमी होत नसले तरी वाढतही नाही व आताच्या काळात त्याचीच गरज आहे.* काय करावे: सकाळी ऊठताना पटकन ऊठून कामाला लागू नका. शांतपणे बसा, कायकाय करायचे आहे त्याणी मनातच यादी करा. याने मन शांत होईलआवरून झाले की मांडी घालून स्वस्थ बसा. एक नाकपूडी बंद करायची, दीर्घ श्वास घ्यायचा व दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. एरवी आपण श्वास खोलपर्यंत जाऊच देत नाही. यात तो थेट पोटापर्यंत जाऊ द्यायचा व नंतरच सोडायचा. असे किमान २७ वेळा करायचे. मन शांत होईलयानंतर सूर्य नमस्कारासारखा व्यायाम किंवा अगदी शाळेत शिकला असाल ती पीटी केली तरी चालेल, मात्र त्यात नियमितता हवी. शरीराला काही एक ताण पडायला हवा. रोजच्या कामांमधून महिलांना हा व्यायाम होऊ शकतो, पण पुरूषांचे तेही होत नाही. त्यामुळे रोजचे चालणे, काही कामे करणे यातूनही व्यायाम होईल. अधिक ताण द्यायचा तर जीम करायला हवे किंवा व्यायाम प्रकार वाढवायला हवे.....................................................

.

आहारतज्ञ विभूषा जांभेकर: घरात बसून जास्त.खाल्ले जाते, नको तेच खाल्ले जाते व त्यातून वजन वाढते. या काळात खाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे आहे, तरच वजन नियंत्रणात राहू शकते.

* काय करावे: रोजच्या जेवणातील किमान ४० टक्के आहार हा कच्चा असावा. म्हणजे वाफवलेली कडधान्ये, इतकेच नाहीतर गाजर, काकडी, सँलड अशा गोष्टीही कच्च्याच खाव्यात. खाताना कधीही टीव्ही मोबाईल याचा वापर करू नये. पोट भरले.हा संदेश मेंदूपर्यंत जाण्याच्या क्रियेत यामुळे अडथळा येतो व त्यातून खाणे वाढते.* शरीराला हालचाल नाही तर साखर शक्यतो आहारात येऊच देऊ नये. गोडाची आवडच असेल तर खजूराचा किस, खारकेची पूड अशी नैसर्गिक साखर खावी.तेलकट, तळलेले, ब्रेड, पाव याचा अतिरेक टाळला नाही तर वजन वाढणारच हे नक्की आहे. त्यामुळे या गोष्टी आहारात नकोच. त्याऐवजी सर्व कडधान्याची मिसळ, त्यावर कांदा लिंबू किंवा बाजरी ज्वारी यालाही मोड येतात, ते भिजवून त्याची खिचडी असे पदार्थ करावेत. 

* दोन वेळा जेवण, दोन वेळच्या खाण्यात किमान ६ तासांचे अंतर या लहानलहान गोष्टींमधूनही वजन आटोक्यात ठेवणे शक्य आहे असा विश्वास जांभेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न