शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 18:04 IST

संचारबंदीमुळे घरातच कैद होण्यातील तोटे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा तोटा वाढत्या वजनाचा. ते आटोक्यात कसे ठेवावे.याविषयी काही तज्ञांच्या टिप्स....

ठळक मुद्देखाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो

पुणे: कोरोनामुळे लादण्यात आलेल्या संचारबंदीचे तोटे आता पुढे येऊ लागले आहेत. शारीरिक हालचाल बंद आणि खाणे जास्त होऊ लागल्याने वजन वाढले जात अनेकांसमोर ही समस्या निर्माण होत आहे.

फिटनेस तज्ञ मनाली मगर : व्यायाम म्हणजे काही कष्टकरी क्रिया असा अनेकांचा समज आहे. मात्र अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो, ते कमी होत नसले तरी वाढतही नाही व आताच्या काळात त्याचीच गरज आहे.* काय करावे: सकाळी ऊठताना पटकन ऊठून कामाला लागू नका. शांतपणे बसा, कायकाय करायचे आहे त्याणी मनातच यादी करा. याने मन शांत होईलआवरून झाले की मांडी घालून स्वस्थ बसा. एक नाकपूडी बंद करायची, दीर्घ श्वास घ्यायचा व दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. एरवी आपण श्वास खोलपर्यंत जाऊच देत नाही. यात तो थेट पोटापर्यंत जाऊ द्यायचा व नंतरच सोडायचा. असे किमान २७ वेळा करायचे. मन शांत होईलयानंतर सूर्य नमस्कारासारखा व्यायाम किंवा अगदी शाळेत शिकला असाल ती पीटी केली तरी चालेल, मात्र त्यात नियमितता हवी. शरीराला काही एक ताण पडायला हवा. रोजच्या कामांमधून महिलांना हा व्यायाम होऊ शकतो, पण पुरूषांचे तेही होत नाही. त्यामुळे रोजचे चालणे, काही कामे करणे यातूनही व्यायाम होईल. अधिक ताण द्यायचा तर जीम करायला हवे किंवा व्यायाम प्रकार वाढवायला हवे.....................................................

.

आहारतज्ञ विभूषा जांभेकर: घरात बसून जास्त.खाल्ले जाते, नको तेच खाल्ले जाते व त्यातून वजन वाढते. या काळात खाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे आहे, तरच वजन नियंत्रणात राहू शकते.

* काय करावे: रोजच्या जेवणातील किमान ४० टक्के आहार हा कच्चा असावा. म्हणजे वाफवलेली कडधान्ये, इतकेच नाहीतर गाजर, काकडी, सँलड अशा गोष्टीही कच्च्याच खाव्यात. खाताना कधीही टीव्ही मोबाईल याचा वापर करू नये. पोट भरले.हा संदेश मेंदूपर्यंत जाण्याच्या क्रियेत यामुळे अडथळा येतो व त्यातून खाणे वाढते.* शरीराला हालचाल नाही तर साखर शक्यतो आहारात येऊच देऊ नये. गोडाची आवडच असेल तर खजूराचा किस, खारकेची पूड अशी नैसर्गिक साखर खावी.तेलकट, तळलेले, ब्रेड, पाव याचा अतिरेक टाळला नाही तर वजन वाढणारच हे नक्की आहे. त्यामुळे या गोष्टी आहारात नकोच. त्याऐवजी सर्व कडधान्याची मिसळ, त्यावर कांदा लिंबू किंवा बाजरी ज्वारी यालाही मोड येतात, ते भिजवून त्याची खिचडी असे पदार्थ करावेत. 

* दोन वेळा जेवण, दोन वेळच्या खाण्यात किमान ६ तासांचे अंतर या लहानलहान गोष्टींमधूनही वजन आटोक्यात ठेवणे शक्य आहे असा विश्वास जांभेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न