आठवडे बाजाराने कोंडी
By Admin | Updated: January 9, 2017 03:03 IST2017-01-09T03:03:16+5:302017-01-09T03:03:16+5:30
येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो़. दर रविवारी भरणाऱ्या

आठवडे बाजाराने कोंडी
थेरगांव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो़. दर रविवारी भरणाऱ्या बाजारामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीने वाहनचालक आणि येथील नागरिक त्रस्त झाले आहेत़
डांगे चौकातून औंध-रावेत आणि चिंचवड - हिंजवडी असे जातात. पुणे -मुंबई महामार्ग आणि हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतुक कोंडीला सर्वच प्रवासी वैतागले आहेत़
हा वाहतूककोंडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ च आहे. या ठिकाणी आठवडे बाजाराला फक्त स्थानिक ांबरोबरचशेजारील गावांमधून ट्रक, टेम्पो भरून नागरीक बाजार करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण जाणवते.
व्यवसायिकांना योग्य प्रकारे मंडई उपलब्ध नसल्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावरच भाजी पाला विकावा लागतो व आपला उदरनिर्वाह करावा लागतो. जर लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन झाले तर हा वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो़ त्यामुळे मंडईचे पुनर्वसन होणार कधी असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत़
डांगे चौकातील रस्ते हे अधिकृत पार्किंग आणि पथारी व्यावसायिकांसाठीच उभारले असल्याचा भास होतो़ आयटी हब, शैैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे, गृहप्रकल्प, पुणे व शहरात जाणारा औंध रस्ता आणि एका दिशेला पिंपरी-चिंचवडकडे जाणारा मार्ग यामुळे डांगे चौकाला दळण- वळणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे येथील वाहतूककोंडीवर कायमची उपाययोजना अपेक्षित आहे.
वाहतूक पोलीस यंत्रणेवर याचा प्रचंड ताण पडतो़ ही वाहतुक कोंडी कमी व्हावी यासाठी महापालिकेने लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन करायला हवे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत़ (वार्ताहर)