शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

आषाढातही लग्नसराई सुरू, मात्र मुहूर्त आणि कोरोनामुळे कार्यालये पडली ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST

पुणे : पूर्वीपासूनच आषाढ महिना लग्नकार्यासाठी अशुभ मानला जातो. पण मागील काही वर्षात आषाढातही लग्न होण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

पुणे : पूर्वीपासूनच आषाढ महिना लग्नकार्यासाठी अशुभ मानला जातो. पण मागील काही वर्षात आषाढातही लग्न होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या नवीन पिढीकडून मुहूर्त नसला तरी आषाढ महिन्यातही मुहूर्त काढून लग्न केले जात असल्याचे पुरोहितांनी सांगितले. पण आता लग्नकार्य होत असले तरी कोरोना आणि लग्नाचे मुहूर्त यामुळे कार्यालयाच्या बुकिंगवर गदा आल्याचे कार्यालय प्रमुखांचे म्हणणे आहे.

आषाढ महिन्यात लग्नसराई सुरू झाली आहे. तरी कार्यालये ओस का पडली आहेत याची चाचपणी ‘लोकमत’ने कार्यालय प्रमुख आणि गुरुजींशी संवाद साधला.

आषाढ महिना सुरू झाला की पहिले दहा दिवस लग्न मुहूर्त असतात. चातुर्मास सुरू झाल्यावर लग्नकार्य केले जात नाही. त्यानंतर चार महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लग्नसराईला पुन्हा सुरुवात होते. परंतु नवीन पिढी या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळे मुहूर्त नसतानाही लग्नासाठी पंचांग बघितले जाते. तसेच अनेक विद्यार्थी परदेशातून आषाढ महिन्याच्या आसपासच मायदेशी येत असतात. चार आषाढ महिन्यानंतर चार महिने वाट पाहणे. त्यांच्यासाठी अशक्य असते. म्हणून लग्न होऊ लागली आहेत. परंतु शहरातील लग्नकार्यालये ओस पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात मर्यादित लोकांमुळे कार्यालय बुकिंगवर गदा आली आहे. नागरिक बंधनामुळे शक्यतो सोसायटी, घराच्या अंगणात, मोकळ्या जागेत लग्नसोहळा पार पाडत असल्याचे कार्यालय प्रमुखांनी सांगितले आहे.

चौकट

लग्न सुरू पण बुकिंग नाही

सद्यस्थितीत महिन्याला एक-दोन बुकिंग होतात. मर्यादित लोक आणि वेळेच्या निर्बंधामुळे कार्यालय भाड्यातही १५ ते २० हजार रुपयांचा फरक पडला आहे. आधी पूर्ण दिवस कार्यालय दिले जात होते. आता सकाळी ७ ते ४ किंवा ७ ते २ यावेळेतच कार्यालय घेतले जाते. त्यासाठीही तेवढेच भाडे आकारले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात लग्नसराईसाठी जुलै महिन्यापर्यंत बुकिंग झाले होते. पण मध्यंतरी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने सर्व बुकिंग रद्द झाले आहेत.

चौकट

५० लोकांची परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नाकार्यासाठी ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये प्रमुखांकडून पोलीस परवानगी, ५० लोकांची नावे मागितली जात आहेत. परंतु काही लग्नांमध्ये ३० ते ३५ लोक येत असल्याने कार्यालयातून कडक नियम लावले जात नाहीत. परंतु मास्क, सॅनिटायजर वापर करण्याच्या सूचना प्रमुख देत आहेत.

चौकट

आषाढ महिन्यात पावसाळा आणि शेतीची कामे

“आषाढ महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. तसेच शेतातील लावणी, पेरणीची कामे याच महिन्यात होतात. त्यामुळे लग्नसराईला बाहेर गावच्या नातेवाईकांना येणे शक्य नसते. हेच सर्वात महत्त्वाचे कारण आहे. आषाढ महिन्यात मुहूर्त नसतो असे शास्त्रात लिहिले आहे. पण सद्यस्थितीत लग्नकार्यात एकत्र येणे शक्य नसल्याने आषाढ महिन्यात लग्न होत नाहीत.”

-डॉ. माधव केळकर गुरुजी

चौकट

चातुर्मासात लग्न, मुंज करू नये

“आषाढ महिना सुरू झाल्यावर पहिले दहा दिवस लग्न, मुंज असे विधी करता येतात. पण चातुर्मास सुरू झाल्यावर कार्तिक महिन्यापर्यंत लग्नाचा मुहूर्त नसतो. असे शास्त्रात दिले आहे. परंतु सद्यस्थितीत नवीन पिढीकडून हे पाळले जात नाही. नक्षत्र, वार, स्थिती, पंचांग बघून मुहूर्त काढले जातात.”

- विश्वनाथ वैशंपायन गुरुजी