शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित, आयएमटीचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:33 IST

हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़. सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़.

ठळक मुद्देजागतिक हवामान दिन विशेषअचूक अंदाजासाठी होणार मदत बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार

पुणे : भारतासारखा लहरी हवामान असलेल्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अधिक अचूक डाटा अत्यावश्यक असतो़. हा डाटा कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमितपणे उपलब्ध व्हावा, यासाठी हवामान विभाग आता त्यांच्या सर्व स्वयंचलित हवामान केंद्रातील माहितीचे संकलन जीपीआरएस बेस असलेल्या मोबाईलद्वारे करणार आहे़. त्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन अधिक विश्वसनीय माहितीचा साठा उपलब्ध होणार आहे़. त्यामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे़ .हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़.तसेच देशभरात १३५० पर्जन्यमापन केंद्रे आहेत़.या ठिकाणी वातावरणाची आर्द्रता, हवेचा वेग, जमीन तापमान अशी माहिती दर तीन तासांनी घेतली जाते़ . सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़. यातील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यात सातत्य राहावे, यासाठी आता या सेंटरमध्ये मोबाईल चीप बसविण्यात येणार आहे़ .त्याद्वारे दर तीन तासांनी संकलित झालेला डाटा हा थेट पुण्यातील हवामान केंद्रामधील संगणकावर उपलब्ध होणार आहे़. या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, मार्च २०१९पर्यंत तो पूर्ण होणार आहे़ . हा डाटा उपलब्ध झाल्याने कृषी व सर्वसाधारण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मनीष रनाळकर यांनी दिली़. 

......................किनारपट्टीवर हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम...भारतातील किनारपट्टीवर नेहमीच चक्रीवादळाचा धोका असतो़. या काळात वाऱ्यांचा वेग सर्वाधिक असतो़. चक्रीवादळात अनेकदा घरे,  वृक्ष उन्मळून पडतात़ अशावेळी वाऱ्याच्या वेगाची अचूक मोजणी व्हावी, यासाठी हवामान विभागाने हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम विकसित केली आहे़. सध्या ही पूर्व किनारपट्टीवरील १९ ठिकाणी लावण्यात आली आहे़ .पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील ७० जिल्ह्यांत ही सिस्टिम एका वर्षात लावण्यात येणार आहे़ ................विमानतळावर दृष्टी सेन्सर...विमानतळावर विमानांच्या उड्डाण व उतरतेवेळी वैमानिकांना तेथील हवामानाची अचूक माहिती मिळणे तसेच धावपट्टीवरील दृश्यमानता नेमकी किती आहे,याची माहिती महत्त्वाची असते़. यासाठी हवामान विभागाने दृष्टी सेन्सर बनविले आहे़ . त्यासाठी बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार झाला आहे़. देशातील विमानतळापैकी २० विमानतळांवर सध्या हे सेन्सर बसविण्यात आले असून, या वर्षभरात आणखी २० ठिकाणी असे सेन्सर बसविण्यात येणार आहेत़ .

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMobileमोबाइल