शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित, आयएमटीचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:33 IST

हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़. सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़.

ठळक मुद्देजागतिक हवामान दिन विशेषअचूक अंदाजासाठी होणार मदत बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार

पुणे : भारतासारखा लहरी हवामान असलेल्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अधिक अचूक डाटा अत्यावश्यक असतो़. हा डाटा कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमितपणे उपलब्ध व्हावा, यासाठी हवामान विभाग आता त्यांच्या सर्व स्वयंचलित हवामान केंद्रातील माहितीचे संकलन जीपीआरएस बेस असलेल्या मोबाईलद्वारे करणार आहे़. त्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन अधिक विश्वसनीय माहितीचा साठा उपलब्ध होणार आहे़. त्यामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे़ .हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़.तसेच देशभरात १३५० पर्जन्यमापन केंद्रे आहेत़.या ठिकाणी वातावरणाची आर्द्रता, हवेचा वेग, जमीन तापमान अशी माहिती दर तीन तासांनी घेतली जाते़ . सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़. यातील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यात सातत्य राहावे, यासाठी आता या सेंटरमध्ये मोबाईल चीप बसविण्यात येणार आहे़ .त्याद्वारे दर तीन तासांनी संकलित झालेला डाटा हा थेट पुण्यातील हवामान केंद्रामधील संगणकावर उपलब्ध होणार आहे़. या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, मार्च २०१९पर्यंत तो पूर्ण होणार आहे़ . हा डाटा उपलब्ध झाल्याने कृषी व सर्वसाधारण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मनीष रनाळकर यांनी दिली़. 

......................किनारपट्टीवर हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम...भारतातील किनारपट्टीवर नेहमीच चक्रीवादळाचा धोका असतो़. या काळात वाऱ्यांचा वेग सर्वाधिक असतो़. चक्रीवादळात अनेकदा घरे,  वृक्ष उन्मळून पडतात़ अशावेळी वाऱ्याच्या वेगाची अचूक मोजणी व्हावी, यासाठी हवामान विभागाने हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम विकसित केली आहे़. सध्या ही पूर्व किनारपट्टीवरील १९ ठिकाणी लावण्यात आली आहे़ .पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील ७० जिल्ह्यांत ही सिस्टिम एका वर्षात लावण्यात येणार आहे़ ................विमानतळावर दृष्टी सेन्सर...विमानतळावर विमानांच्या उड्डाण व उतरतेवेळी वैमानिकांना तेथील हवामानाची अचूक माहिती मिळणे तसेच धावपट्टीवरील दृश्यमानता नेमकी किती आहे,याची माहिती महत्त्वाची असते़. यासाठी हवामान विभागाने दृष्टी सेन्सर बनविले आहे़ . त्यासाठी बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार झाला आहे़. देशातील विमानतळापैकी २० विमानतळांवर सध्या हे सेन्सर बसविण्यात आले असून, या वर्षभरात आणखी २० ठिकाणी असे सेन्सर बसविण्यात येणार आहेत़ .

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMobileमोबाइल