शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Weather Alert : रत्नागिरीत अतिवृष्टी, विदर्भात मुसळधार तर, मध्य महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 19:37 IST

हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट दिला असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे : मुंबईसह कोकणात हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर मुंबईत पाऊस झाला नसला तरी कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून रत्नागिरीत अतिवृष्टी झाली. विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. 

गेल्या २४ तासात रत्नागिरी २४०, कणकवली, राजापूर १३०, दोडामार्ग, सावंतवाडी १२०, दापोली, मुल्दे ११०, गुहागर, लांजा, म्हसळा, संगमेश्वर, देवरुख, वालपोई ९०, माणगाव ८०, कुडाळ, पोलादपूर ७० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रात चांदगड, गगनबावडा ५०, महाबळेश्वर ३०, आजारा, लोणावळा २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील धर्माबाद ९०, परभणी ७०, हदगाव ६०, अहमदपूर, किनवट, माहूर ५०, अर्धापूर, जिंतूर, उमारी ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. 

विदर्भातील आर्णी ८०, बल्लारपूर, गौड पिंपरी ५०, चंद्रपूर, उमरखेड ४०, दिग्रस, घाटंजी, जिवती, राजुरा ३० मिमी पाऊस झाला असून सर्वदूर हलका पाऊस झाला आहे.  घाटमाथ्यावर मात्र पावसाचे प्रमाण अजूनही कमी आहे. रविवारी रात्रभर मुसळधार पावसानंतर सोमवारी दिवसभरात रत्नागिरीमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून दिवसभरात केवळ ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर ३ आणि कोल्हापूर १ मिमी पाऊस झाला आहे.

हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट दिला असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. 

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांबरोबरच विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशल