शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा

By राजू इनामदार | Updated: October 11, 2024 17:09 IST

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ते अजित पवारांबरोबर आहेत, म्हणून सोडतात व नंतर स्वत: त्यांच्याबरोबर बसतात-उठतात, हा राजकारणातला गोंधळ आम्ही दुर करणार

पुणे : राजकारणाची सध्याच्या नेत्यांनी बजबजपुरी केली आहे. कोण कुठे होता आणि कुठे असेल, काहीच सांगता येत नाही. राजकारणातील हा गोंधळ दूर करण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे. येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवू, असा निर्धार छत्रपती संभाजी राजे यांनी कार्यकर्त्यांबरोबर व्यक्त केला.

स्वराज्य पक्ष स्थापनेची घोषणा संभाजी राजे यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी दुपारी १२ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला राज्य सरचिटणीस धनंजय जाधव यांच्यासह राज्यातील विविध शहरांमधून पदाधिकारी उपस्थित होते. भगव्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृह भरले होते. मिरवणुकीने आलेल्या संभाजी राजे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

प्रस्थापित राजकारण्यांवर टीका करताना संभाजी राजे यांनी शरद पवार यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कोणालाही सोडले नाही. शरद पवार देशाचे नेते होते. परदेशी हातांखाली काम करणार नाही म्हणत काँग्रेसपासून बाजूला झाले, पुन्हा त्यांच्याबरोबर गेले. अजित पवार उठता-बसता शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतात आणि भाजपबरोबर जातात. भाजपतील मोदींसह सगळे अजित पवारांवर सर्वात मोठा भ्रष्टाचारी म्हणून टीका करतात व त्यांनाच बरोबर घेतात. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ते अजित पवारांबरोबर आहेत, म्हणून सोडतात व नंतर स्वत: त्यांच्याबरोबर बसतात-उठतात. हा सगळा गोंधळ हे लोक जनतेला गृहित धरून करतात. त्यामुळेच त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे संभाजी राजे म्हणाले.

स्वराज्य पक्ष या सर्वांना उत्तर देण्यासाठी आणि हा गोंधळ संपवण्यासाठी आहे, असे स्पष्ट करून संभाजी राजे म्हणाले, ‘आम्हाला ते हलक्यात घेतात, चेष्टा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची अशीच चेष्टा झाली, पण अंती तेच जिंकले. महात्मा गांधी यांनीही तेच सांगितले की, सुरुवातीला ते तुम्हाला दुर्लक्षित करतील, हसतील, नंतर लढतील व त्या लढतीत तुमचाच जय होईल. आमचे ध्येय तेच आहे. राज्यातील एकातरी विरोधी पक्षाने थेट पंतप्रधानांना, तुम्ही ज्याचे उद्घाटन केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? हे विचारण्याचे धाडस केले का? आम्ही ते केले. आता समविचारींना बरोबर घेऊन परिवर्तन महाशक्ती तयार करून विधानसभा जिंकणार, असा निर्धार संभाजी राजे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीvidhan sabhaविधानसभाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार