शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

"भोंग्यांबाबत मुस्लिम बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार", पुणे शहराध्यक्षांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:56 IST

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे

पुणे : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आता मात्र ईदच्या मध्ये काही अडचण येऊ नये. म्हणून ४ तारखेपर्यंत भोंगे उतरले पाहिजेत असा इशारा राज यांनी दिला आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे. त्यानंतर कालपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मनसैनिकांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवातही झाली होती. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष आणि प्रमुखांचे शोध पोलीस घेत होते. त्यातच पुण्याचे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर नॉट रिचेबल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. तर माजी शहराध्यक्ष वसंत मोरे बालाजी दर्शनाला गेल्याचे त्यांनी सांगितले होते. 

पण आज सकाळी वसंत मोरे यांनी फेसबुकवर आंदोलनात सहभागी असल्याची पोस्ट टाकली आहे. त्यानंतर नॉट रिचेबल असणारे नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ बाबर हेही आता माध्यमांसमोर येऊन बोलले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मी पोलिसांसमोर आलो नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

बाबर म्हणाले, भोंग्यांबाबत मुस्लिम बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत.  मशिदींवरचेच नव्हे तर सर्वच प्रकारच्या प्रार्थनास्थळांवरचे भोंगे उतरवले जावे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे केवळ चार तारीखच नाही तर यापुढेही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बाबर यांनी सांगितले आहे. 

भोंगे काढले नाहीत तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू 

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रबोधनकार ठाकरे, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे अशा विविध मुद्द्द्यांवरून त्यांनी पवारांना खडेबोल सुनावले. त्यानंतर राज ठाकरे यांनी भोंग्याच्या विषयाला हात घातला होता. रमजान ईदपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची भूमिका घेणार नाही. परंतु त्यानंतर जर मशीदवरून भोंगे काढले नाहीत. तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज यांनी सगळ्यांना दिला आहे. 

टॅग्स :MNSमनसेPresidentराष्ट्राध्यक्षSocialसामाजिकPoliticsराजकारण