शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

नयनतारांना विरोध करणाऱ्यांविरुद्ध ‘हम बोलेंगे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 01:24 IST

समाजवादी कार्यकर्ते एकत्र : भाषणाचे जाहीर वाचन

पुणे : भारतीय लोकशाही यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याचे काम चालू आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा चेपून लोकशाही कमी होऊन हुकूमशाही वाढत आहे. राजकीय लोक धर्म व जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. साहित्य, लेखन, विचार, बोलणे अशा स्वातंत्र्यात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे विचार असणाºया ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या विचारांचे भाषण दाबले गेले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमंत्रण आणि साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाच्या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे मत पुरोगामी आणि परिवर्तनवादी, तसेच समाजवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि लोकशाही उत्सव समिती आयोजित नयनतारा सहगल यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे जाहीर वाचन आणि अभिव्यक्ती चर्चा या हम बोलेंगे कार्यक्रमात हे सर्व बोलत होते. यावेळी स्त्रीवादी विद्या बाळ, काँग्रेसनेते अभय छाजेड, ज्येष्ठ कलावंत अतुल पेठे, साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी आपले विचार मांडले.राजकरणात वेगळ्या प्रकारची रणनीती चालू झाली आहे. साहित्य संमेलनाचे संयोजक नयनतारा यांना बोलून देत नाहीत. हे एवढ्या खालचे पातळीचे आहेत का? सहगल यांचे आमंत्रण रद्द केले. त्यांच्या या विचारांना दाबले गेले याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे विचार पुरोगामी आणि परिवर्तनवादी चर्चेतून मांडले गेले. काँग्रेसनेते अभय छाजेड म्हणाले, नयनतारा यांच्या संवेदनशील भाषणाने सामान्य जनतेवर एवढा प्रभाव पडेल वाटले नव्हते. असे विचार या ठिकणी ऐकायला मिळाले याचे कौतुक वाटते. साहित्य संमेलन हे हिंदी, इंग्रजी, मराठी चॅनल वर दाखवले जात नव्हते. पण या गोष्टीमुळे त्याची सर्व ठिकाणी चर्चा झाली. एक विद्वान पंडितांच्या मुलीने हे लेखन केले आहे.सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय...अतुल पेठे म्हणाले, की कलावंत हे समाजातील सर्व प्रकारच्या गोष्टींची आपल्या साहित्य, लेखन याच्याशी तुलना करत असतात. नयनतारासुद्धा या कलाकारांप्रमाणे आपली भूमिका लेखणीतून सर्वांसमोर मांडत आहेत. लोकशाहीवर विश्वास ठेवणारे कलावंत होतात. हुकूमशाहीवर विश्वास ठेवणारे हमाल होतात. सांस्कृतिक दहशतवाद वाढत आहे.स्त्रीला नाकारल्याने नाक कापलेय...आपण पाकिस्तानशी युद्ध करायचा विचारही करू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे रद्द होण्यामागे माझा काही हात नाही असे सांगतात. ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या स्त्रीला नाकारता तेव्हा तुमचे नाक कापले गेले हे त्यांना कसे कळाले नाही, असे विद्या बाळ यांनी सडकून टीका केली.साहित्य संमेलनात येणाºया प्रत्येक माणसाला नयनतारा माहीतच होत्या असे नाही. त्यांचे आमंत्रण रद्द झाले तरी मी जाणार होते. नागरिकांना नयनतारा कोण आहेत, याची ओळख करून देणार होते. पण हे आमंत्रण रद्द झाले व भाषणही होऊन दिले नाही. ही फारच लाजिरवाणी गोष्ट वाटली म्हणून मी गेले नाही.- विद्या बाळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनPuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया