शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

नयनतारांना विरोध करणाऱ्यांविरुद्ध ‘हम बोलेंगे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 01:24 IST

समाजवादी कार्यकर्ते एकत्र : भाषणाचे जाहीर वाचन

पुणे : भारतीय लोकशाही यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याचे काम चालू आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा चेपून लोकशाही कमी होऊन हुकूमशाही वाढत आहे. राजकीय लोक धर्म व जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. साहित्य, लेखन, विचार, बोलणे अशा स्वातंत्र्यात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे विचार असणाºया ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या विचारांचे भाषण दाबले गेले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमंत्रण आणि साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाच्या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे मत पुरोगामी आणि परिवर्तनवादी, तसेच समाजवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि लोकशाही उत्सव समिती आयोजित नयनतारा सहगल यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे जाहीर वाचन आणि अभिव्यक्ती चर्चा या हम बोलेंगे कार्यक्रमात हे सर्व बोलत होते. यावेळी स्त्रीवादी विद्या बाळ, काँग्रेसनेते अभय छाजेड, ज्येष्ठ कलावंत अतुल पेठे, साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी आपले विचार मांडले.राजकरणात वेगळ्या प्रकारची रणनीती चालू झाली आहे. साहित्य संमेलनाचे संयोजक नयनतारा यांना बोलून देत नाहीत. हे एवढ्या खालचे पातळीचे आहेत का? सहगल यांचे आमंत्रण रद्द केले. त्यांच्या या विचारांना दाबले गेले याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे विचार पुरोगामी आणि परिवर्तनवादी चर्चेतून मांडले गेले. काँग्रेसनेते अभय छाजेड म्हणाले, नयनतारा यांच्या संवेदनशील भाषणाने सामान्य जनतेवर एवढा प्रभाव पडेल वाटले नव्हते. असे विचार या ठिकणी ऐकायला मिळाले याचे कौतुक वाटते. साहित्य संमेलन हे हिंदी, इंग्रजी, मराठी चॅनल वर दाखवले जात नव्हते. पण या गोष्टीमुळे त्याची सर्व ठिकाणी चर्चा झाली. एक विद्वान पंडितांच्या मुलीने हे लेखन केले आहे.सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय...अतुल पेठे म्हणाले, की कलावंत हे समाजातील सर्व प्रकारच्या गोष्टींची आपल्या साहित्य, लेखन याच्याशी तुलना करत असतात. नयनतारासुद्धा या कलाकारांप्रमाणे आपली भूमिका लेखणीतून सर्वांसमोर मांडत आहेत. लोकशाहीवर विश्वास ठेवणारे कलावंत होतात. हुकूमशाहीवर विश्वास ठेवणारे हमाल होतात. सांस्कृतिक दहशतवाद वाढत आहे.स्त्रीला नाकारल्याने नाक कापलेय...आपण पाकिस्तानशी युद्ध करायचा विचारही करू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे रद्द होण्यामागे माझा काही हात नाही असे सांगतात. ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या स्त्रीला नाकारता तेव्हा तुमचे नाक कापले गेले हे त्यांना कसे कळाले नाही, असे विद्या बाळ यांनी सडकून टीका केली.साहित्य संमेलनात येणाºया प्रत्येक माणसाला नयनतारा माहीतच होत्या असे नाही. त्यांचे आमंत्रण रद्द झाले तरी मी जाणार होते. नागरिकांना नयनतारा कोण आहेत, याची ओळख करून देणार होते. पण हे आमंत्रण रद्द झाले व भाषणही होऊन दिले नाही. ही फारच लाजिरवाणी गोष्ट वाटली म्हणून मी गेले नाही.- विद्या बाळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनPuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया