शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 20:15 IST

यशवंत सिन्हा यांच्याकडून गांधी शांती यात्रेचे आयाेजन करण्यात आले असून या यात्रेच्या माध्यमातून सीएए कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

पुणे : नागरिकत्व संशाेधन कायदा ( सीएए) हा गैरसंविधानिक कायदा असून काळा कायदा आहे. या कायद्याच्या विराेधात आम्ही गांधी शांती यात्रा महाराष्ट्रातून सुरु केली आहे. ही यात्रा भारताच्या विविध राज्यांमधून दिल्लीतील राज घाटावर जाणार आहे. सरकारने सीएए हा कायदा मागे घ्यावा अन्यथा आम्ही राजघाटावर आंदाेलन सुरु ठेवणार आहाेत असा निर्धार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केला. पुण्यात गांधीभवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यंमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते. 

राष्ट्रमंच, फ्रेंड ऑफ डेमोक्रसी, शेतकरी जागर मंच या संघटनांकडून गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून या यात्रेला सुरुवात झाली. आज ही यात्रा पुण्यातील गांधी भवन येथे आली. यावेळी सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिन्हा यांनी सरकारवर जाेरदार टीका केली. ते म्हणाले, देशात आज अशांती आहे. सीएए या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या कायद्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. याच्या विराेधात युवक रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विद्यापीठ आंदाेलनाची केंद्रे बनली आहेत.विद्यार्थ्यांच्या आंदाेलनांचं दमण भाजप शासित राज्यांमध्ये हाेत आहे. गांधींच्या विचारांच्या विपरीत सरकार काम करत आहे. त्यामुळे आम्ही ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :PuneपुणेYashwant Sinhaयशवंत सिन्हाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक