शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल; मस्साजोगच्या धनंजय देशमुखांनी घेतली कस्पटेंची भेट

By किरण शिंदे | Updated: May 26, 2025 15:52 IST

आमचं दुःख आणि त्यांच दुःख काही वेगळं नाही, घरातला माणूस सोडून जात असेल, तर ते भोग आहेत ते कुणाच्याच नशिबी येऊ नये

पुणे: मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे वैष्णवी हगवणे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कस्पटे येथील निवासस्थानी गेले होते. त्यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी न्यायासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, आंदोलन करावे लागेल म्हणत कस्पटे कुटुंबीयांना धीर दिला.

धनंजय देशमुख म्हणाले, आमचं दुखणं एवढं मोठं आहे. त्यामुळे याची आम्हाला कल्पना आहे. दुःख सहन करत पुढे कशी वाटचाल करावी लागते याविषयी मी त्यांच्याशी चर्चा केली. आमचं दुःख आणि त्यांच दुःख काही वेगळं नाही. घरातला माणूस सोडून जात असेल. तर ते भोग आहेत ते कुणाच्याच नशिबी येऊ नये. त्यांना भेटायला येणाऱ्या सगळ्या लोकांनी या काका काकू सोबत एक नऊ महिन्याचं बाळ आहे. त्यामुळे या दुःखातून कसं सावरायचं याचं बळ त्यांना द्यावं 

घरी बसून आपल्याला न्याय मिळत नाही

आम्ही देखील त्याच परिस्थितीतून जात आहोत ते सुद्धा त्याच परिस्थितीमधून जात आहे. दुःख कधी कुणाचं कमी होत नसतं. हे सगळे भोग आपल्याला भोगावे लागतात आपण काय इतकं पाप केलं होतं या सगळ्या गोष्टी आपल्या भोगायला आल्या याचा विचार करून सुद्धा काही उपयोग होत नाही. या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायला ईश्वराने त्यांना बळ द्यावं. जे पीडित कुटुंब आहेत मग ते देशमुख कुटुंब असो किंवा कस्पटे कुटुंब असो दुःख तर झालेल आहे. आपले दोन माणसं आपल्याला सोडून गेलेले आहेत. मात्र परीक्षा तर याच्यापुढे आहे. न्यायालयाची पायरी चढताना आपल्याला सगळं सिद्ध करायचं आहे.  त्याच्यातूनच आपल्याला न्यायाची अपेक्षा करावी लागेल. आणि जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला अहिंसेच्या मार्गाने, न्यायाच्या मार्गाने योग्य दिशा कशी शोधता येईल हे पाहिले पाहिजे. कारण घरी बसून आपल्याला न्याय मिळत नाही. न्याय मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर जाव लागत उपोषण, आंदोलन करावे  लागते. 

न्यायाची लढाई म्हणायला पाहिजे

या सगळ्या परिस्थितीतून माझं गाव माझे कुटुंब सगळ्या जाती धर्मातील लोक गेलेले आहेत. या लढाईला खरं तर न्यायाची लढाई म्हणायला पाहिजे.  कारण निष्पाप लोकांना मारलं जातं याला न्याय मागणं कसं म्हणता येईल. माझ्या भावाने किंवा वैष्णवी ताईने काय पाप केलं होतं की, त्यांना कायमचं आपल्या लेकरांना आणि कुटुंबाला सोडून जावं लागलं. न्याय मागण्यासाठी आपल्याला त्या प्रक्रियेत यावे लागेल. आणि न्याय घ्यावा लागेल.

टॅग्स :PuneपुणेBeedबीडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी