शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कांदा निर्यात शुल्काबाबत शेतकऱ्यांना न्याय देऊ : पणनमंत्री अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन सत्तार यांनी ही माहिती दिली...

पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावले. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांत सुमारे एक हजार कोटींचा कांदा निर्यात झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन सत्तार यांनी ही माहिती दिली. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, पणन संचालक शैलेश कोतमिरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक व सचिव संजय कदम, सरव्यवस्थापक व मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, वखार महासंघाचे अध्यक्ष दीपक तावरे, सुनील पवार उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, सध्या देशात ४० ते ४५ हजार टन कांदा उपलब्ध असून, दर महिन्याला १७ ते १८ लाख टन कांद्याची मागणी असते. नवीन कांदा येईपर्यंत शिल्लक कांदा पुरेल. गेल्या वर्षी देशातून ४ हजार ५०० कोटी रुपयांचा कांदा निर्यात करण्यात आला होता. तर गेल्या तीन महिन्यांत ९९७ कोटींचा कांदा निर्यात करण्यात आला. आताही निर्यात सुरू असून शेतकरी निर्यात करू शकतात. मात्र, भविष्यातील परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने हा निर्णय सर्व राज्यांसाठी लागू केला आहे. तो लागू करताना ग्राहकांचाही विचार केला आहे. मात्र, याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे केंद्राशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चित मार्ग काढतील.”

केंद्र सरकारने नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघामार्फत (एनसीसीएफ) राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. हा दर बाजारभावापेक्षा जादा आहे. केंद्र सरकार जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत असते. शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विक्री करावी. त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल. शेतकऱ्यांना नाफेडकडून वेळेवर पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. नाफेडला ठरवून दिलेल्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कांदा उत्पादन ठिकाणीही खरेदी केंद्रे उभारावी यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही सत्तार म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारPuneपुणेFarmerशेतकरी