शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात शुल्काबाबत शेतकऱ्यांना न्याय देऊ : पणनमंत्री अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन सत्तार यांनी ही माहिती दिली...

पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावले. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांत सुमारे एक हजार कोटींचा कांदा निर्यात झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन सत्तार यांनी ही माहिती दिली. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, पणन संचालक शैलेश कोतमिरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक व सचिव संजय कदम, सरव्यवस्थापक व मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, वखार महासंघाचे अध्यक्ष दीपक तावरे, सुनील पवार उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, सध्या देशात ४० ते ४५ हजार टन कांदा उपलब्ध असून, दर महिन्याला १७ ते १८ लाख टन कांद्याची मागणी असते. नवीन कांदा येईपर्यंत शिल्लक कांदा पुरेल. गेल्या वर्षी देशातून ४ हजार ५०० कोटी रुपयांचा कांदा निर्यात करण्यात आला होता. तर गेल्या तीन महिन्यांत ९९७ कोटींचा कांदा निर्यात करण्यात आला. आताही निर्यात सुरू असून शेतकरी निर्यात करू शकतात. मात्र, भविष्यातील परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने हा निर्णय सर्व राज्यांसाठी लागू केला आहे. तो लागू करताना ग्राहकांचाही विचार केला आहे. मात्र, याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे केंद्राशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चित मार्ग काढतील.”

केंद्र सरकारने नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघामार्फत (एनसीसीएफ) राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. हा दर बाजारभावापेक्षा जादा आहे. केंद्र सरकार जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत असते. शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विक्री करावी. त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल. शेतकऱ्यांना नाफेडकडून वेळेवर पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. नाफेडला ठरवून दिलेल्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कांदा उत्पादन ठिकाणीही खरेदी केंद्रे उभारावी यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही सत्तार म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारPuneपुणेFarmerशेतकरी