शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:21 IST

पहलगामचा हल्ला कसा झाला? आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे? हा प्रश्न कोणी विचारत नाही

पुणे : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, संसदेनेही तसा ठराव केला आहे. जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका असा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी दिला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.

पहलगामचा हल्ला कसा झाला? आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे? हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि उत्तरही कोणी देत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्याला पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची संधी होती. गुजरात ते काश्मीर सर्व सीमांवर पाकचे ड्रोन होते. पाकला अद्दल घडवावी, अशी संपूर्ण देशाची भावना होती. मात्र, आपण अचानक शस्त्रसंधी का केली, असा सवाल ओवेसी यांनी केला.

ओवेसी म्हणाले, दिल्लीत बसून एक जादुगार जादूचे प्रयोग करत आहे. आता सर्वांना त्यात आनंद वाटत असला, तरी यात दोन पिढ्यांचे नुकसान झाले आहे. देशातील २५ टक्के तरुणांना योग्य शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालची आहे. लोकसंख्येच्या लाभांशाचे वरदान संपेल आणि या पिढ्या म्हाताऱ्या होतील, तेव्हा काय नुकसान झाले हे समजेल, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. महाराष्ट्रातील पूरस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थिती पंतप्रधान राज्यातील पूरग्रस्तांसाठी निधी का देत नाही? असा सवाल ओवैसी यांनी केला.

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे, असे सांगून ओवैसी म्हणाले, सध्या विद्यार्थिदशेत असलेल्या युवकांना गोरक्षक बनवले जात आहे, एका धर्माविरोधात भडकावले जात आहे. मात्र, आपले खरे शत्रू हे मुस्लिम नसून सध्याचे सत्ताधारी आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. मुस्लिमांना धमक्या देणे, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवणे असे प्रकार घडत आहेत. डोक्यात हवा गेल्याने सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ते लक्षात येत नाही. मुस्लिम समाजाला एका बाजूला सारून भारत विश्वगुरू होणार नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Claim what's yours; don't wait, it won't come: Owaisi

Web Summary : Asaduddin Owaisi urged India to reclaim Pak-occupied Kashmir. He criticized the government's handling of security, economic policies impacting youth, and lack of aid for flood-hit Maharashtra farmers. Owaisi also accused the ruling party of using divisive politics.
टॅग्स :PuneपुणेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMuslimमुस्लीमAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPoliticsराजकारणPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर