शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:31 IST

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प

राजगुरुनगर : आम्ही बांधावर फिरून जनतेच्या समस्या, प्रश्न जाणतो. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. लोक कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प म्हणून हे अभियान आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिव संकल्प अभियानाचा प्रारंभ व कार्यकर्ता मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. ६) शिरूर लोकसभा मतदारसंघात राजगुरुनगर (ता. खेड) येथे करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सभेला संबोधित केले. 

एकनाथ शिंदे म्हणाले,  विरोधी पक्ष बेताल आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परकीय गुंतवणुकीत राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. तुम्ही सत्तेत आल्यावर ही स्थिती तिसऱ्या क्रमांकावर गेली. आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग पळवल्याचे कांगावे खोटे आहेत. 

खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेनेचे मिशन ४८ आहे, तसे माझे पण शिरूर मतदारसंघाचा विकास हे मिशन आहे. माझा मागील निवडणुकीत पराभव झाला, मात्र मी थांबलो नाही विकास करत राहिलो. मतदारसंघात पाच वर्षे वणवण फिरत आहे. पाच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद मिळाली. त्यामुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. परंतु मी खासदारकी मिळवण्यासाठी आक्रोश करणार नाही, असे खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली.

पुणे - नाशिक रेल्वे, कळमोडी प्रकल्पात लक्ष घाला 

धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी ४०० कोटींचा आराखडा मंजूर केला, त्याचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते फोडावा, अशी शंभू भक्तांची मागणी आहे. पुणे - नाशिक रेल्वे मार्गाच्या कामात प्रगती नाही, त्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. कळमोडी प्रकल्प योजनेत लक्ष घालावे. भामा - आसखेड प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा. भात पिकाला अर्थसहाय्य व चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भाषणातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण