शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:31 IST

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प

राजगुरुनगर : आम्ही बांधावर फिरून जनतेच्या समस्या, प्रश्न जाणतो. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. लोक कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प म्हणून हे अभियान आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिव संकल्प अभियानाचा प्रारंभ व कार्यकर्ता मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. ६) शिरूर लोकसभा मतदारसंघात राजगुरुनगर (ता. खेड) येथे करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सभेला संबोधित केले. 

एकनाथ शिंदे म्हणाले,  विरोधी पक्ष बेताल आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परकीय गुंतवणुकीत राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. तुम्ही सत्तेत आल्यावर ही स्थिती तिसऱ्या क्रमांकावर गेली. आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग पळवल्याचे कांगावे खोटे आहेत. 

खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेनेचे मिशन ४८ आहे, तसे माझे पण शिरूर मतदारसंघाचा विकास हे मिशन आहे. माझा मागील निवडणुकीत पराभव झाला, मात्र मी थांबलो नाही विकास करत राहिलो. मतदारसंघात पाच वर्षे वणवण फिरत आहे. पाच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद मिळाली. त्यामुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. परंतु मी खासदारकी मिळवण्यासाठी आक्रोश करणार नाही, असे खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली.

पुणे - नाशिक रेल्वे, कळमोडी प्रकल्पात लक्ष घाला 

धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी ४०० कोटींचा आराखडा मंजूर केला, त्याचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते फोडावा, अशी शंभू भक्तांची मागणी आहे. पुणे - नाशिक रेल्वे मार्गाच्या कामात प्रगती नाही, त्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. कळमोडी प्रकल्प योजनेत लक्ष घालावे. भामा - आसखेड प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा. भात पिकाला अर्थसहाय्य व चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भाषणातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण