शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अच्छे दिन नकाे पुर्वीचे सच्चे दिन हवेत : प्रियंका चतुर्वेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 18:45 IST

खूप झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन काॅंग्रेसकडून बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुणे : काॅंग्रेसने देशासाठी त्याग करणारे चार गांधी दिले. त्यामध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा समावेश होतो. भाजपने मात्र देशाला तीन मोदी दिले आहेत. त्यामध्ये ललित मोदी, नीरव मोदी आणि नरेंद्र मोदींचा समावेश आहे. माेदींनी साडेचार वर्षात देशाला दिलेली वचने त्यांनी पूर्ण न करता केवळ विश्वासघात केला आहे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे अशी स्थिती राममंदिराबाबत अाणि राफेल की किमत नही बताएेंगे अशी परिस्थीती राफेल विमानाबाबत असल्याचे मत काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. तसेच अाम्हाला अच्छे दिन नकाे तर पुर्वीचे सच्चे दिन हवे अाहेत असेही त्या ठणकावून म्हणाल्या.  

    काॅंग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. काॅंग्रेस पक्षाच्या देश, राज्य व पुण्याच्या विकासात काॅंग्रेसने केलेल्या भरीव योगदानाविषयी व गेल्या साडे चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वायत्त संस्था संपुष्टात आणल्याचे चित्र खूप झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनानंतर पत्रकार परिषदेत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते. 

    चतुर्वेदी म्हणाल्या, भाजप सरकारकडे त्यांनी केलेल्या कोणत्याही कामाची नोंद नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरमध्ये या सरकारविरोधी रोष आहे. सन १९८० पासून धर्म आणि जातीमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप करीत आहे. त्यागाच्या नावावर राजनैतिक पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. साडेचार वर्षात देशाला दिलेली वचने त्यांनी पूर्ण न करता केवळ विश्वासघात केला आहे. अटलबिहारी वाजपेयी एका कार्यकाळापुरतचे प्रधानमंत्री होते. ती वेळ भाजपावर पुन्हा येणार असून नरेंद्र मोदी सरकारचा देखील सत्तापालट होणार आहे. देवाला जाती-धर्मामध्ये विभागण्याचे काम त्यांनी केले आहे. सबका साथ सबका विकास ऐवजी कुछ का साथ कुछ का विकास याप्रमाणे हे सरकार काम करीत आहे. सुटा-बुटातील त्यांच्या मित्रांचाच फायदा करुन दिला जात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी