शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत; लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 1:26 PM

काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देलेखक या नात्याने समाजासमोर वास्तवाचा आरसा ठेवला पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुखलक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रदान

पुणे : आज भारतात कुरूपता वाढत चालली आहे. असहिष्णुता, धार्मिकता याचे बंध अधिक घट्ट होत असल्याने संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत, अशी खंत ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. लेखक या नात्याने समाजासमोर वास्तवाचा आरसा ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. २१ हजार रुपये असे पुरस्कार स्वरूप आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त आर. पी. जोशी उपस्थित होते.खरा लेखक तो असतो जो दलित आणि शोषितांचा आवाज बनतो. खरा लेखक हा पुरोगामी असतो. प्रतिव्यवस्था सत्ताकेंद्री झाली की ती इतरांचे शोषण करते. याच व्यवस्थेला हादरा दिला पाहिजे. आज विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद या तिन्हींपासून आपण दूर आहोत. आपल्याला प्रश्नच पडत नाहीत. आंधळेपणाने विश्वास ठेवून सर्व गोष्टींचा स्वीकार करीत आहोत, अशा शब्दांत त्यांनी समाजव्यवस्थेवर बोट ठेवले. महिला असुरक्षितता, समान दर्जा  यापासून ते शेतकरी आत्महत्या या विषयावर त्यांनी भाष्य केले. सध्या सावित्रीची लेक विरुद्ध जोतिबाचा पुत्र असा संघर्ष सुरू आहे. स्त्रीकडे बुद्धी आणि कर्तव्य आहे, प्रतीक्षा आहे समानतेची. तिला समाजात समान स्थान देणे पुरुषवर्गाला मान्य आहे का? तर हे चित्र नक्कीच आशादायी नाही. पुरोगामी आणि सुसंस्कृततेचा वारसा पुढे नेण्यात जोतिबाचा पुत्र कमी पडला आहे, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. 

काकासाहेब गाडगीळ काँग्रेसचे होते खरे कार्यकर्तेखरा काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे काकासाहेब गाडगीळ होते. साधनशुचिता आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते, त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, अशी भावना लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Laxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखPuneपुणे