शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत; सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:22 IST

कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही, हे सगळ्या भारतीयांना सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो

पुणे : भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या कारवाईचे खासदार सुप्रिया सुळेंनी कौतुक केलं आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थात आपण सगळे या काळात भारतीय आहोत. आपण देशा सोबत आहेत. आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करते. हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे. भारत सरकारने दिलेले ड्राफ्टींग अप्रतिम आहे ते सगळ्यांनी वाचा त्याच देखील कौतुक करता येईल.

भारताने सांगितल आहे की, हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही. हे सगळ्या भारतीयांना, तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो. ज्यांच्या घरात ही दुर्दैवी गोष्ट झाली आहे. ज्यांना वीरमरण आलं. त्यांच्या घरच्याच्या आयुष्यातील सुख आपण परत आणू शकत नाही. ही लढाई दहशतवादाविरोधात आहे हे भारताने सांगितल आहे. नाव काय दिलं हे त्या त्या सरकारच्या मनावर असतं. भारतीय सैन्य जे करत त्याच नेहमी मनापासून मी स्वागत करते. ते कर्तृत्वान आहेत आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. 

राजनाथ सिंह यांचं आणि सरकारच कौतुक 

युद्ध आपण लढलो आहोत. आपला इतिहास युद्धाचा आहे. भारत हा एक आहे राजकीय विषय नाही. आम्ही भारतासोबत आहोत हे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं. ही सगळी चर्चा झाली होती. आम्ही सगळे भारतीय आहोत देशाच्या ऐक्यासाठी पूर्ण ताकतीने सरकारसोबत आहोत अस सांगितलं होत. राजनाथ सिंह यांचं आणि सरकारच कौतुक करायला हवं. 

ही वेळ दहशतवाद्याला हरवायची आहे

ही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही आम्ही सगळ बैठकीत सांगितलं होतं. हे सगळ नाजुकपणे हाताळलं पाहिजे. या काळात आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी शांत रहावं आणि कौतुक करावं. ही वेळ दहशतवाद्याला हरवायची आहे. हे जग दहशतवादाच्या विरोधात आहे. भारत सरकार प्रधानमंत्री आणि त्यांची सगळी टीम यांना सहकार्य करण्याची भूमिका हे सगळ्या नागरिकांचे कर्तव्य असायला हवं.  

टॅग्स :PuneपुणेOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSupriya Suleसुप्रिया सुळेairforceहवाईदलNCPराष्ट्रवादी काँग्रेस