पुणे : भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या कारवाईचे खासदार सुप्रिया सुळेंनी कौतुक केलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थात आपण सगळे या काळात भारतीय आहोत. आपण देशा सोबत आहेत. आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करते. हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे. भारत सरकारने दिलेले ड्राफ्टींग अप्रतिम आहे ते सगळ्यांनी वाचा त्याच देखील कौतुक करता येईल.
भारताने सांगितल आहे की, हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही. हे सगळ्या भारतीयांना, तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो. ज्यांच्या घरात ही दुर्दैवी गोष्ट झाली आहे. ज्यांना वीरमरण आलं. त्यांच्या घरच्याच्या आयुष्यातील सुख आपण परत आणू शकत नाही. ही लढाई दहशतवादाविरोधात आहे हे भारताने सांगितल आहे. नाव काय दिलं हे त्या त्या सरकारच्या मनावर असतं. भारतीय सैन्य जे करत त्याच नेहमी मनापासून मी स्वागत करते. ते कर्तृत्वान आहेत आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
राजनाथ सिंह यांचं आणि सरकारच कौतुक
युद्ध आपण लढलो आहोत. आपला इतिहास युद्धाचा आहे. भारत हा एक आहे राजकीय विषय नाही. आम्ही भारतासोबत आहोत हे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं. ही सगळी चर्चा झाली होती. आम्ही सगळे भारतीय आहोत देशाच्या ऐक्यासाठी पूर्ण ताकतीने सरकारसोबत आहोत अस सांगितलं होत. राजनाथ सिंह यांचं आणि सरकारच कौतुक करायला हवं.
ही वेळ दहशतवाद्याला हरवायची आहे
ही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही आम्ही सगळ बैठकीत सांगितलं होतं. हे सगळ नाजुकपणे हाताळलं पाहिजे. या काळात आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी शांत रहावं आणि कौतुक करावं. ही वेळ दहशतवाद्याला हरवायची आहे. हे जग दहशतवादाच्या विरोधात आहे. भारत सरकार प्रधानमंत्री आणि त्यांची सगळी टीम यांना सहकार्य करण्याची भूमिका हे सगळ्या नागरिकांचे कर्तव्य असायला हवं.