शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Alandi: आळंदी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:23 IST

इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे विकत पाणी घेण्याची वेळ आळंदीकरांवर आली आहे. भामा आसखेड धरणातील कमी झालेला पाणीपुरवठा लक्षात घेता पुण्याप्रमाणे आळंदी शहरातही दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असतो. १८ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

आळंदी शहरास पुणे महानगरपालिकेच्या पाइप लाइनवरून पाणीपुरवठा होतो. पुणे महानगरपालिकेची सतराशे मिलिमीटर पाइपलाइनला गळती झाली आहे. तसेच, पुणे शहरात पाणी कपात धोरणामुळे पाणी बंद असल्याने सदर पाइपलाइन गळती काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे मोठ्या स्वरूपातील काम असल्यामुळे कामास विलंब लागत आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर कुरळी येथील जॅकवेल केंद्रावर पाणी पोहोचण्यास सुमारे चार तासांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर आळंदीला पाणी पोहोचण्यास सुमारे अर्धा - एक तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे आळंदी शहरात भामा आसखेडवरून पाणी येण्यास विलंब होणार आहे. पाणी आल्यानंतर जलकुंभ भरून शहरात उशिराने पाणीपुरवठा विभागवार सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आळंदी शहरात पाण्याची टंचाई नित्याची झाली आहे. ऐनवेळी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने आळंदीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार कधी? असा सवाल स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

 भामा आसखेड वरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याचे काम सकाळी ६.३० वाजता पूर्ण झाले असून कुरुळी येथील केंद्रावर पंपिंगचे काम सुरू आहे. सदर पाईपलाईन १६ किमी असून दोन दिवसापासून कोरडी असल्याने लाईन वाश आउट करण्यासाठी चार तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे कुरुळी येथील केंद्रावर सकाळी १०.३० पर्यंत पाणी येण्याची शक्यता असून तेथून आळंदी शहरास सकाळी ११.०० पर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यानंतर टाक्या भरून सुमारे बाराच्या सुमारास शहरातील गावठाण परिसरातील टप्प्यास पाणी सोडले जाईल.

- शीतल जाधव, पाणीपुरवठा विभाग प्रमुख आळंदी नगरपरिषद.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे