शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Alandi: आळंदी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:23 IST

इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे विकत पाणी घेण्याची वेळ आळंदीकरांवर आली आहे. भामा आसखेड धरणातील कमी झालेला पाणीपुरवठा लक्षात घेता पुण्याप्रमाणे आळंदी शहरातही दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असतो. १८ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

आळंदी शहरास पुणे महानगरपालिकेच्या पाइप लाइनवरून पाणीपुरवठा होतो. पुणे महानगरपालिकेची सतराशे मिलिमीटर पाइपलाइनला गळती झाली आहे. तसेच, पुणे शहरात पाणी कपात धोरणामुळे पाणी बंद असल्याने सदर पाइपलाइन गळती काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे मोठ्या स्वरूपातील काम असल्यामुळे कामास विलंब लागत आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर कुरळी येथील जॅकवेल केंद्रावर पाणी पोहोचण्यास सुमारे चार तासांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर आळंदीला पाणी पोहोचण्यास सुमारे अर्धा - एक तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे आळंदी शहरात भामा आसखेडवरून पाणी येण्यास विलंब होणार आहे. पाणी आल्यानंतर जलकुंभ भरून शहरात उशिराने पाणीपुरवठा विभागवार सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आळंदी शहरात पाण्याची टंचाई नित्याची झाली आहे. ऐनवेळी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने आळंदीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार कधी? असा सवाल स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

 भामा आसखेड वरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याचे काम सकाळी ६.३० वाजता पूर्ण झाले असून कुरुळी येथील केंद्रावर पंपिंगचे काम सुरू आहे. सदर पाईपलाईन १६ किमी असून दोन दिवसापासून कोरडी असल्याने लाईन वाश आउट करण्यासाठी चार तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे कुरुळी येथील केंद्रावर सकाळी १०.३० पर्यंत पाणी येण्याची शक्यता असून तेथून आळंदी शहरास सकाळी ११.०० पर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यानंतर टाक्या भरून सुमारे बाराच्या सुमारास शहरातील गावठाण परिसरातील टप्प्यास पाणी सोडले जाईल.

- शीतल जाधव, पाणीपुरवठा विभाग प्रमुख आळंदी नगरपरिषद.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे