शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

मांजरी गावात पाण्याचा प्रश्न बिकट, महापालिकेचा पाणीपुरवठा अपुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 20:06 IST

महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. पाणी नाही तर कर कोठून भरायचा?

२० टक्के पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव

हडपसर : महापालिकेत नव्याने सामाविष्ट २३ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या गावांमध्ये मांजरी गावाचा देखील सामावेश आहे. मांजरी गावाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यास अपयश आले आहे. त्यानंतर देखील गावांसह मांजरी गावात २० टक्के दराने पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. पाणी नाही तर कर कोठून भरायचा? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

मांजरी गावातील झोपडपट्टी परिसर, मांजरी फार्म, महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, मुंढवा रस्ता या भागातील नागरिकांना गेल्या महिन्यापासून पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. तसेच पाणी मिळण्यासाठी टँकरला हजारो रुपये मोजण्याची वेळ आहे. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यानंतर गावात पाणी येईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. त्यानुसार महापालिकेने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे; परंतु संपूर्ण गावात पाण्याचे जाळे निर्माण करण्यास अद्याप महापालिकेला यश आलेले नाही. तर ज्या ठिकाणी पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे तेथून नळ कनेक्शन घेणे सुरू केले आहे; परंतु अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा घसा कोरडा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी नाही तिथे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फेब्रुवारी महिन्यातच कूपनलिकांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याचेच पाणी मिळण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असताना वापरायच्या पाण्याचा देखील प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा जाणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. मांजरी गावातील वस्त्यांवर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पाणी सोडले जात होते. मात्र, आता ते बंद झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर पुरवला जात आहे. मात्र, तोदेखील वेळेत येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मांजरीत पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आली आहे. त्या टाकीत पाणी सोडले जात आहे.

पाणी नाही; पण कर जोरात

मांजरी गाव महापालिकेत समाविष्ट होऊन अडीच वर्षे उलटली आहेत. तरीही महापालिकेला गावच्या पाण्याचे नियोजन करता आलेले नाही. मात्र, मिळकत कर आकारणी जोरात सुरू केली होती. मांजरी गावात अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न बिकट आहे. गावकऱ्यांच्या शेतातील विहिरी आणि शेताला सोडणाऱ्या बोअरवेलमधून गावातील इतर नागरिक पाण्याचा वापर करत आहेत. महापालिकेत समावेश झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल ही मोठी आपेक्षा नागरिकांना होती. मात्र, महापालिका अद्याप पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे पाणी पाण्याच्या पाइपलाइनचे कामे सुरू आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत तर पाण्याचा प्रश्न बिकट होत असतो. जो भाग कूपनलिकांवर अवलंबून आहे, त्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. महापालिकेने वेळीच यावर मार्ग काढून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. - राजेंद्र साळवे, अध्यक्ष, अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड