शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नीरा देवघर कालव्याला सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:37 IST

शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती.

ठळक मुद्देधरणातून नीरा नदीत मागील चार महिन्यांपासून पाण्याचा विसर्ग सुरू

 भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि मागील दीड महिन्यांपासून नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला गुरुवारी रात्री उशिरा ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यामुळे पिकाला जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या नीरा देवघर धरणात सध्या ४२ टक्के पाणीसाठा असून, धरणातून नीरा नदीत ८०० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. मात्र नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडले होते. त्यानंतर तब्बल मागील दीड महिन्यापासून पाणी सोडले नसल्याने भावेखल, अंगसुळे, कंकवाडी, सांगवी, करंजे, नाटंबी, आंबेघर, शिरवलीतर्फे भोर, वेनवडी, उत्रौली, वडगावडाळ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूग, ऊस व इतर पिके वाळून जात आहेत.यामुळे नाटंबी येथील शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र वरून आदेश नसल्याने पाणी सोडण्यात येत नसल्याचे सांगितले. यामुळे निराश होऊन शेतकरी परत आले होते. भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि धरण १०० टक्के भरते. या वर्षीही धरण १०० टक्के भरले होते. धरणातून नीरा नदीत मागील चार महिन्यांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदरचे पाणी वीर धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून बारामती आणि फलटणला जाते. हे चक्र सुरू आहे. मात्र धरण असलेल्या भागातील  शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी का मिळत नाही, त्यासाठी नियमावली लावली जाते. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी