शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

नीरा देवघर कालव्याला सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:37 IST

शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती.

ठळक मुद्देधरणातून नीरा नदीत मागील चार महिन्यांपासून पाण्याचा विसर्ग सुरू

 भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि मागील दीड महिन्यांपासून नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला गुरुवारी रात्री उशिरा ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यामुळे पिकाला जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या नीरा देवघर धरणात सध्या ४२ टक्के पाणीसाठा असून, धरणातून नीरा नदीत ८०० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. मात्र नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडले होते. त्यानंतर तब्बल मागील दीड महिन्यापासून पाणी सोडले नसल्याने भावेखल, अंगसुळे, कंकवाडी, सांगवी, करंजे, नाटंबी, आंबेघर, शिरवलीतर्फे भोर, वेनवडी, उत्रौली, वडगावडाळ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूग, ऊस व इतर पिके वाळून जात आहेत.यामुळे नाटंबी येथील शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र वरून आदेश नसल्याने पाणी सोडण्यात येत नसल्याचे सांगितले. यामुळे निराश होऊन शेतकरी परत आले होते. भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि धरण १०० टक्के भरते. या वर्षीही धरण १०० टक्के भरले होते. धरणातून नीरा नदीत मागील चार महिन्यांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदरचे पाणी वीर धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून बारामती आणि फलटणला जाते. हे चक्र सुरू आहे. मात्र धरण असलेल्या भागातील  शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी का मिळत नाही, त्यासाठी नियमावली लावली जाते. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी