शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

दिवाळीनंतर विषाणूजन्य ‘ताप’ श्वसनविकार, पोटाच्या तक्रारी; मास्क वापरण्याचा सल्ला

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: November 21, 2023 15:55 IST

सणासुदीच्या काळातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम

पुणे: दिवाळीत फाेडलेले फटाके तसेच फराळाचे तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे माेठयांसह लहान मुलांमध्ये श्वसनविकार, पाेटाच्या तक्रारी व विषाणूजन्य ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांत या रुग्णांची संख्या वाढली आहे. यासाठी काही काळजी घेण्यासह संतुलित आहाराचे सेवन करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

दिवाळीतील फटाक्यांमुळे मुलांसह माेठयांना श्वसनविकाराची समस्या वाढली आहे. फटाक्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रदूषकांच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्यानंतर मुलांना दमा किंवा ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांचा त्रास उद्भवू शकतो. मोठा आवाज आणि मोठ्या प्रमाणातील प्रकाशाने डोकेदुखी, मानसिक ताण आणि झोपेसंबंधीच त्रास हाेत असल्याचेही दिसून आले आहे. तसेच या सणासुदीच्या काळातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचेही दिसून आलेले आहे.

मिठाई व तळलेल्या पदार्थाचा परिणाम

या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई आणि तळलेले फराळाचे पदार्थ यांची रेलचेल असते. यावर चांगलाच तावही मारला जाताे. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे संपुर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढते आणि दात किडतात आणि भविष्यात मधुमेहासारखी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

तापामध्ये झाली वाढ...

दिवाळीनंतर लगेचच विषाणूजन्य तापामध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. खोकला, सर्दी, घसा खवखवणे, ताप, उलट्या होणे अशा सामान्य तक्रारी आढळून येत. असल्याची माहिती, लुल्लानगर येथील नवजात तथा बालरोगतज्ञ डॉ. वृषाली बिचकर यांनी दिली.

दिवाळीनंतरच्या कालावधीत मुलांमध्ये ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते, तर प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहेत. खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा सामान्य तक्रारी घेऊन मुले रुग्णालयात दाखल होत आहेत. यासाठी प्रदूषण आणि फटाक्यांच्या धुराचा प्रादुर्भाव कमी करणे, मास्कचा वापर करणे तसेच धूळ, परागकण, प्राण्यांची केस किंवा श्वासोच्छवासाच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. - डॉ. सम्राट शाह, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट

काय काळजी घ्याल?

- मिठाई आणि तळलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात करावे.- फराळ तसेच मिठाईला पौष्टीक करण्यासाठी त्यात काजू, तेलबिया आणि गूळाचा वापर करा.- सकाळी चालायला जाताना मास्कचा वापर करावा- सकाळच्या वेळी हवेत धुरके दिसून आल्यास ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी फिरायला जाणे टाळावे

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यDiwaliदिवाळी 2023Socialसामाजिकdoctorडॉक्टरfoodअन्न