शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

गाव तस चांगलं...... विकायला काढलं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 19:51 IST

पुण्यापासून २० किमी अंतरावर असलेल पुरंदर तालुक्यातील बोपगाव हे गाव गावकऱ्यांनी चक्क विकायला काढलंय.

ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सामुहिकरित्या राजीनामे देण्याचे इशारे देऊन ही काहीच फरक नाहीयेत्या दोन दिवसात तहसिल कार्यालयाचे पथक पाठवून वस्तुस्थितीची माहिती घेत कार्यवाही करणार

बाळासाहेब काळेजेजुरी: कर्जबाजारी किंवा परिस्थितीसमोर हार पत्करलेला माणूस जेव्हा हाताशी काही उरत नाही तेव्हा त्याच्या जवळच्या गोष्टी विक्रीला काढतो. परंतु, कधी तुम्हाला एखादे गावच विक्रीला काढल्याची बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.पूर्ण गावालाच अतिक्रमणांचा विळखा पडल्याने वैतागलेल्या तरुणांनी गावभर गाव विक्रीला काढल्याची प्रसिध्दीपत्रके चिकटवली. आणि आजूबाजूच्या परिसरात गाव विक्रीला काढल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही घटना आहे पुरंदर तालुक्यातील बोपगावची... आजपर्यंत सर्व काही वस्तू विकायला काढलेल्या आपण पाहिलं आहे, पण पुरंदर तालुक्यात अस एक गाव आहे. जिथल्या गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढलंय. पुण्यापासून २० किमी अंतरावर असलेल पुरंदर तालुक्यातील बोपगाव हे गाव श्री क्षेत्र कानिफनाथ गड देवस्थान म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. पण हे गाव सध्या ग्रामस्थांनी मोफत विकायला काढलेले आहे. कारण सुद्धा तसेच आहे. या गावात १९ एकर ग्रामपंचायतीच्या गावठाणाची गायरान जमीन आहे. ग्रामपंचायतीने गायरानात ९ ते १० बेघर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी पूर्वीच जागा देण्यात आलेली होती. त्याचबरोबर अडीच एकर जमीन ही ग्रामपंचायतीने महावितरणला विद्युत प्रकल्पासाठी दिली आहे. तेथे वीज उपकेंद्र उभारण्यात आलेले आहे. याशिवाय पाच एक्कर जागा श्री कानिफनाथ गड देवस्थानसाठी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी देण्याचे ग्रामपंचायतीचे पूर्वीच नियोजन ही आहे. शिल्लक जागा ही भविष्यातील समाजपयोगी कामासाठी ग्रामपंचायतीने राखीव ठेवली होती. मात्र, गेल्या वर्षभरात राजकीय नेत्यांनी गायरानाच्या पुणे सासवड रस्त्यालगत या रिकाम्या जागेवर आपला मालकी हक्क दाखवून पत्र्याची पक्की शेड उभी करून आपला संसार थाटण्याचा उद्योग उभारला आहे. सासवड पुणे मार्गालगतच्या याच जागेत कानिफनाथ ट्रस्ट पंचकमिटीच्या नियोजित जागेचा बोर्ड होता. तो ही तोडून त्या ठिकाणी अनेकांनी रातोरात गाळे उभे करून व्यवसाय थाटले आहेत. त्यांना महावितरणकडून अनधिकृत वीज जोडही मिळत आहेत. आज या जागेवर राजरोसपणे अतिक्रमणे सुरू आहे. बोपगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना हरकती आल्यावरदेखील ही पंचायतीला न जुमानता अतिक्रमणे वाढतच राहिली आहेत. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी या मोकळ्या जागेवर सामूहिक आंदोलन केले होते. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाकडे, ग्रामपंचायतीकडे पत्रे देऊन अतिक्रमणे हटवण्याची मागणीही केलेली आहे. ग्रामपंचायतीने ही वारंवार हरकती घेऊन अतिक्रमणे थांबत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सामुहिकरित्या राजीनामे देण्याचे इशारे देऊन ही काहीच फरक पडला नाही.  प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. तोपर्यंत ही तक्रार कमी होण्यातली नाही. गावातील १९ एक्कराचे हे गायरान आहे. कानिफनाथ देवस्थानचे विश्वस्त दीपक फडतरे म्हणाले, हे समाज उपयोगी उपक्रमांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. मात्र प्रतिष्ठांनी या जागेवर अतिक्रमणे केलेली आहेत.

या संदर्भात गावातील तरुण सहकार्यांसह आम्ही ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी  यांच्याकडे अतिक्रमणे हटवण्याची मागणी केलेली असल्याचे सांगितले. या संदर्भात पुरंदर दौंडचे विभागीय अधिकारी संजय आसवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या दोन दिवसात या ठिकाणी तहसिल कार्यालयाचे पथक पाठवून वस्तुस्थितीची माहिती घेत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Purandarपुरंदरcollectorतहसीलदारgram panchayatग्राम पंचायत