शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Prithviraj Chavan: विक्रम गोखलेंनी मुख्यमंत्री व्हावे; याचा मलाही आनंद होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 16:47 IST

गोखलेंनी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे

पुणे : पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला आहे. त्यावेळी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना - भाजपने एकत्र यावे असेही ते यावेळी म्हणाले आहेत. यावरच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोखलेंना उत्तर दिले आहे. 

चव्हाण म्हणाले, विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल.

''विचार स्वातंत्र्य असल्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय झाली आहे. अशा लोकांना राजाश्रय मिळतो ही दुर्दैवी बाब आहे. अशी विधानं करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा गंध नाही, कुणी कुणी काय काय केलं, किती परिश्रमाने हे स्वातंत्र्य मिळालं हेच त्यांना माहीत नाही. रक्तरंजित क्रांती झाली नाही हेच या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.'' 

अशी विधाने करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी 

कंगनाच्या वक्तव्याबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करून ज्या लोकांनी आपले बलिदान दिले, ज्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या अशा सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. व्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळे अशी विधाने केली जातात परंतु अशा व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची विधानं करण्यासाठीची मानसिकता भारतीय जनता पक्षाकडून पसरवली जात आहे.

अशा लोकांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा शोध घ्यावा 

हिंदुत्व हि पॉलिटिकल फॅसिस्ट फिलॉसॉफी आहे..या तत्वज्ञानाबद्दल अशा प्रकारची लोक समोर येऊन समाजात अंतर पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकेबद्दल अनादर करणारे उद्गार काढले नव्हते.  हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन कोण देतो हे शोधायला पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणVikram Gokhaleविक्रम गोखलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा