शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

विजय शिवतारे २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त; पत्नी मंदाकिनी शिवतारे यांचा खळबळजनक दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 4:35 PM

संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे असल्याचेही मंदाकिनी शिवतारे यांनी म्हटले आहे. 

पुणे : पुरंदर तालुक्याचे माजी आमदार व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे हृदयविकाराच्या झटक्यानंतर शिवतारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना कौटुंबिक वादाने तोंड वर काढले आहे. शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे यांनी फेसबुकवरून पोस्ट लिहीत आपल्या भावांवर आरोप केले आहे. तर आता ममता यांच्या आरोपाला शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पती विजय शिवतारे हे गेल्या २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत” असा दावा देखील त्यांनी केला आहे. 

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यात विजय शिवतारे यांनी शिवसेनेचे प्राबल्य वाढवले. तसेच तिथून आमदारकी मिळवत देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यमंत्रीपद देखील भूषविले. मात्र, शिवतारे यांच्या कुटुंबात काही दिवसांपासून सुरु असलेल्या कौटुंबिक वादाने आता सार्वजनिक रूप धारण केले आहे. शिवतारे यांची मुलगी आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नी असणाऱ्या ममता यांनी विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे अशा आशयाची पोस्ट केली आहे.

पुढे त्या म्हणतात, मागील काही दिवसांत फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटतं असा उल्लेख ममता यांच्या फेसबुक पोस्टमध्ये आहे. 

शिवतारे यांच्या मुलीने केलेल्या आरोपाला पत्नीचं उत्तर विजय शिवतारे यांची मुलगी ममता  शिवदीप लांडे यांनी केलेल्या आरोपाला त्यांची आई आणि शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे मुलीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. तसंच विजय शिवतारे हे गेल्या २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त राहत असून त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मिनाक्षी रमेश पटेल  महिलेसोबत पवई येथे राहत आहेत. यामध्ये संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

संपत्ती नावावर केल्यावरही मानसिक त्रास देणे सुरूच... ममता शिवदीप लांडे आपल्या फेसबुक पोस्ट म्हणतात,मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अशाच बदनामीच्या धमक्या देत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

पुन्हा एकदा बाबा पुरंदरसाठी आपला जीव ओततील...

आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका आणि बाबाही अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयूमध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले. माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!!!,” असंही ममता लांडे यांनी नमूद केलं आहे. 

ममता शिवतारे- लांडे यांनी उपस्थित केलेले सवाल: 

*१९९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?* बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला?* बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?* विनय शिवतारे आणि विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं?* वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांसोबत असा व्यवहार कितीही वाईट असले तरी कोणी   मुलगा करणे योग्य आहे का?

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडिया