शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 13:14 IST

राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही, आपले प्रश्न हक्काने मांडा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील महिन्यात सहजीवन व्याख्यानमाला या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमानंतर तेथील नागरिक, विद्यार्थी आणि महिलांशी संवाद साधला. त्यामध्ये ५० ते ६० नागरिकांनी मनसेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करत राज ठाकरे यांनी त्या ५० ते ६० इच्छुकांची आबा बागुल उद्यान येथे सकाळी भेट घेतली. आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी ५० ते ५२ नागरिक उपस्थित होते. त्यांच्याशी लोकमतने संवाद साधला. तेव्हा राज यांनी तुमचे प्रश्न, अडचणी हक्काने मांडण्याचा सल्ला या नागरिकांना दिला आहे. 

''तुम्ही सामान्य नागरिक आहात. समाजातील समस्यांवर तम्ही काय करू शकता यासाठी पुढाकार घ्या. अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक लढवायला पाहिजे असं काही नाही. अशा प्रकारचे मार्गदर्शन राज ठाकरे यांनी आम्हाला केले असल्याचे नागरिकांनी सांगितले. आम्हाला अपेक्षित नव्हतं कि एक राजकारणी शब्द देतो आणि खरच तो कार्यक्रम झाला याच कौतुक वाटतंय. आम्ही राज ठाकरेंनी सांगितल्यानुसार नक्कीच काम करणार आहोत.'' 

राज ठाकरे अंध विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील 

सध्यस्थितीत अंध विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर आम्ही राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला प्रश्न सुटली असं विश्वास निर्माण झाला आहे. तसेच त्यांनी अंध विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आम्हाला दिले असल्याचे एका अंध संस्थेच्या महिलेने सांगितले आहे. 

राजकारण सोडून ही चर्चा झाल्याने नागरिक समाधानी 

राज ठाकरे शब्दाला मान ठेवून आले यातच आम्हाला आनंद झाला, तुम्ही तुमचे प्रश्न मांडा असे त्यांनी यावेळी सांगितले. राज साहेबांशी सुंदर चर्चा झाली. तुम्ही कुठल्याही पक्षात काम करा, फक्त महाराष्ट्रासाठी काम करा असंही ते म्हणाले आहेत. ही चर्चा राजकारण सोडून झाल्याने नागरिक समाधानी होते. 

राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही

 सहजीवन व्याख्यानमालेत राज साहेबांनी जे राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तिथल्या संयोजकांकडे नावे दया असे सांगितले होते. त्यामध्ये ५८ लोक होती. त्यापैकी ५२ आज आले होते. त्या लोकांना राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत राजकारणात येण्यासाठी काय अडचणी येत आहेत का? याबद्दल हे राज साहेबांनी सर्वांशी चर्चा केली. काही लोकांना मुंबईला बोलावलंय, त्यांच्या कौशल्यानुसार कामे देण्यात येणार असल्याचे मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणStudentविद्यार्थीMNSमनसे