शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

प्रज्ञासिंहचा विजय चिंताजनक : ‘ दक्षिणायन’ चे आवाहन अजूनही कायमच : डॉ. गणेश देवी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 13:09 IST

सत्ता कोणाचीही असो देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहिले पाहिजे..

ठळक मुद्देअभिव्यक्तीचा संकोच होता कामा नयेसामाजिक, सांस्कृतिक भूमी तयार करणे हे वेळ घेणारे काम

पुणे : सत्ता कोणाचीही असो देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहिले पाहिजे. ‘दक्षिणायन’ ने त्यावेळी केलेल्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये, तो होतो आहे असे वाटत असेल तर विरोध करा’ हे आवाहन अजूनही कायमच आहे असे दक्षिणायन संस्थेचे प्रमुख, प्रसिद्ध भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीच्या आधी देशभरातील काही प्रसिद्ध कलावंत, लेखक यांनी डॉ. देवी यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या दक्षिणायन संस्थेच्या वतीने एक आवाहन करण्यात आले होते. त्यात त्यांनी सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी अशा विचारवंतांच्या हत्या होत आहेत, त्यामुळे आताच्या सत्तेला विरोध करावा अशा आशयाचे आवाहन केले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला व प्रत्युत्तर म्हणून देशातील अन्य काही कलावंत लेखक यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना मतदान करा असेही आवाहन केले होते.दक्षिणायन संस्थेच्या आवाहनाला लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाला असे डॉ. देवी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आमचे आवाहन अजूनही कायम आहे. कारण झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरच ते केले होते व परिस्थितीत अजूनही काही फरक पडला असे वाटत नाही. लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाला हे खरे असले तरीही त्याची कारणे वेगळी आहे. समाजमाध्यमांनी तयार केलेली पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची प्रतिमा, देशातील बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे सत्ताधाऱ्यांबरोबर झालेले साटेलोटे व फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आलेली ‘एक्स्ट्रिीम राईट’ची लाट (उजव्या विचारसरणीचे कट्टरतावादी) यामुळे भारतीय मतदार प्रभावी होऊन हे झाले असावे. देशामध्ये पुलवामा व बालाकोट यानंतर देशात देशभक्तीची लाट उसळवली गेली. मात्र असे असले तरी दक्षिणायन चे आवाहन अजूनही कायम आहे. लोकांना सातत्याने सांगत रहावे लागते व देशातील विचारवंतांचे ते कामच आहे असे डॉ. देवी म्हणाले.प्रसिद्ध लेखक गणेश विसपुते हेही या आवाहनात सहभागी होते. ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई ही दिर्घ पल्ल्याची लढाई असते. आता निकाल असा लागला असला तरी म्हणून त्याचा अर्थ आम्ही चुकीचे होतो असा होत नाही. सामाजिक, सांस्कृतिक भूमी तयार करणे हे वेळ घेणारे काम असते. त्यात सध्या माहितीचा इतका मारा होत असतो की त्यात समाजमन गोंधळून जाते. तसे होईल अशी स्थिती देशात नक्कीच निर्माण झाली होती. दोन अधिक दोन चार असे पक्के उत्तर या लढाईत येत नाही. इतका मोठा विजय झाला तर जनतेने रस्त्यावर येऊन जल्लोष का केला नाही. याआधी जनता पार्टी व त्यानंतर इंदिरा गांधी यांचा विजय झाला त्यावेळी तो जनतेने साजरा केला. यावेळी तसे दिसले नाही. त्यामुळे आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही किंवा कमी मिळाला असे म्हणजे योग्य की अयोग्य यात जाण्यात अर्थ नाही. आमचे म्हणणे आम्ही मांडतच राहणार आहोत.मुंबईस्थित आनंद पटवर्धन म्हणाले, मीही त्या आवाहनात होतो. घटनाच तशा घडत होत्या. विचारवंतांच्या हत्या होत होत्या, नाट्यप्रयोगांना, चित्रपटांना बंदी घालण्याची भाषा होत होती. अशा वेळी असे आवाहन करावेच लागते. लेखक मेला आहे असे लेखकाला म्हणावे लागते याला वातावरण चांगले आहे असे कसे म्हणता येईल. अशा वेळी एक कलावंतांची जी जबाबदारी असते ती पार पाडणे महत्वाचे असते. निवडणूक निकाल असे लागले याचा अर्थ कोणी आमचे ऐकले नाही असा काढता येणार नाही किंवा आम्ही आमचे म्हणणे मांडणे बंद करू असाही नाही. आमचे काम आम्ही केले. ते करतच राहणार आहोत. .......

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार