शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Ambika Sarkar: ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

By श्रीकिशन काळे | Updated: August 10, 2023 20:42 IST

त्यांचा जन्म मुंबईत २९ जानेवारी १९३२ रोजी झाला होता...

पुणे : ज्येष्ठ लेखिका अंबिका रमेशचंद्र सरकार (वय ९१) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. पतीचे आणि तीन अपत्यांचे निधन झाल्याचे दु:ख त्यांनी पचवले होते. त्यांच्या पश्चात नातू असून, ते परदेशात असतात. अंबिका सरकार यांचे माहेरचे नाव अंबिका नारायण भिडे असून, त्यांचा जन्म मुंबईत २९ जानेवारी १९३२ रोजी झाला होता.

गिरगावातील शारदासदनमध्ये त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्या विल्सन महाविद्यालयातून बीए झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून १९५४ साली त्यांनी एमएची पदवी संपादन केली. १९५५ ते १९६०पर्यंत एल्फिन्स्टन महाविद्यालयात व नंतर १९९२ साली निवृत्त होईपर्यंत त्या सिडन्हॅम कॉलेज, मुंबई येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. समकालीन लेखिकांच्या कथालेखनाचा प्रभाव त्यांच्यावर होता. कमीत शब्दांत अधिक आशय, उत्कट भावभावना समर्थपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न अंबिका सरकार यांनी केला. ‘नकळत्या वयापासून १९५० पर्यंत माझे भरपूर वाचन झाले होते,’ असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या संस्कारी वाचनातून त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली. १९५२-१९५३मध्ये त्यांनी ७-८ कथा एका मागोमाग एक लिहिल्या. त्यांतील एका कथेला स्पर्धेत पारितोषिक मिळाले होते.

त्यांच्या ‘चाहूल’ (१९८०) आणि ‘प्रतीक्षा’ (१९८१) हे दोन कथासंग्रह; ‘एका श्वासाचं अंतर’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. त्यांचे लिखाण मोजकेच असले तरी आशयपूर्ण आहे. त्यांच्या कथा ‘सत्यकथा’, ‘दीपावली’, ‘हंस’ यांसारख्या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. थिऑसफी आणि बौद्धधर्म हे त्यांच्या आवडीचे विषय होते. भिक्खू संघ रक्षित यांच्या ‘हिस्टरी ऑफ माय गोइंग फॉर रेफ्यूज’ या पुस्तकाचा ‘माझ्या शरण गमनाचा इतिहास’ आणि ‘द बोधिसत्त्व आयडिअल’ या पुस्तकाचा ‘बोधिसत्त्व आदर्श’ हा अनुवाद त्यांनी केला होता.  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड