शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वसई, विरारचे रस्ते गेले पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:59 IST

शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते.

वसई - शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते. पावसाचा जोर कमी जास्त असला तरी रिपरिप सुरुच होती. अधुन मधुन उघडीप देणाऱ्या सरींचा जोर सायंकाळनंतर वाढला होता.वसई-विरार परिसर पुर्णपणे जलमय झाला असून मुख्य रस्त्यांना नद्यांचे व काही भागात डबक्याचे स्वरूप आले आहे. समाधानाची बाब म्हणजे धरणे तुडूंब भरुन वाहत आहेत. वसईतील नवघर माणिकपूर भागात प्रामुख्याने उमेलमान, चुळणे भागात गुढगाभर पाणी साचले आहे. वसई गावात एस टी डेपो परिसर, किल्लाबंदर, पाचूबंदर तर तिकडे वासळई, तर्खड , निर्मळ तर पार्वती क्रॉस मधील मैदान पूर्ण स्विमिंग पूल झाले होते.यामध्ये वसई पूर्व भागातील सातिवली, गोखिवरे, महामार्ग भाग तर आद्योगिक वसाहतीत पाणी भरल्याने रविवारी कंपनीत जाणाºया कामगारांचे पूर्ण हाल झाले. याचा विपरीत परिणाम वसई पूर्व-पश्चिम वाहतुकीवर झाला. दुसरीकडे विरार मध्ये मुसळधार पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. ऐन पावसाळ्यात वसई सहित नालासोपारा विरार भागातील एस टी स्थानक व रेल्वे स्टेशन नजीक पाणी साचून राहत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या रस्त्यावर नोकरदार मंडळी, व्यापारी यांचे मात्र सतत पडणाºया पावसाने पुरते हाल केले होते. विरार मधील बºयाच ठिकाणी पश्चिम पट्टा, बोळींज, आगाशी पूर्व भागातील मनवेल पाडा, कारगिलनगर, मोरेगाव, एम बी इस्टेट, विवा कॉलेज परिसर आदी भाग संपूर्ण जलमय झाला होता.या ठिकाणी बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींनी शहर रचनेला फाटा दिल्याने जागोजागी पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे वसई आणि विरार च्या तुलनेत सर्वत अधिक पावसाचा फटका नालासोपाराभागाला बसतो. पूर्व सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी, तुळींज, टाकीपाडा, नालासोपारा बस आगार, संतोष भुवन, नागिनदास पाडा आदी वस्त्यांमध्ये पाणीच पाणी होते तर बहुतांशी लोकांच्या घरात पाणी शिरले होते. यामध्ये व्यापारी व त्यांची दुकाने, गोडावून यामधील वस्तू, फर्निचर आदींचे मोठे नुकसान झाल्याची ओरड ऐकावयास मिळाली. एकूणच शनिवार-रविवार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची फरफट वाचली.दरम्यान, शहरातुन होणारी रिक्षाची वाहतूक व दुचाकी यांना रविवारचा दिवसही डोके दुखीचा ठरला. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक खाड्या बंद पडल्या होत्या.विरारमधील पापडखिंड धरण ओव्हरफ्लोआधीच कमी पाणी साठवणुकीची क्षमता असलेले विरार नजीकचे पापडखिंड हे धरण दोन दिवस पडत असलेल्या पावसाने मात्र ओव्हरफ्लो होऊन वाहते आहे.दरवर्षी अगदी डिसेंबरमध्येच या धरणातील पाण्याची पातळी खाली जात असते. मात्र, या वर्षीपासून एक वेगळे तांत्रिक कारण देत महापालिकेने हे पापडखिंड धरण नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून बंद केले आहे.नवघर-वसई रोड बस आगारात तळेच तळेसालाबादप्रमाणेवसई रोड रेल्वे स्टेशनजवळील बस आगारात पावसामुळे मोठाले तळे झाले असून गुडघाभर पाण्यातून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे.त्यातच याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्थाच नसल्याने दरवर्षी पालिका व एस टी महामंडळ यांच्यात साफसफाईवरून वाद निर्माण होत असतो.मात्र तरीही या पाण्यातून वाट काढूंन लोकांना पुढे जावे लागते. ही परिस्थिती अशीच कायम आहे. या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस