शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वसई, विरारचे रस्ते गेले पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:59 IST

शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते.

वसई - शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते. पावसाचा जोर कमी जास्त असला तरी रिपरिप सुरुच होती. अधुन मधुन उघडीप देणाऱ्या सरींचा जोर सायंकाळनंतर वाढला होता.वसई-विरार परिसर पुर्णपणे जलमय झाला असून मुख्य रस्त्यांना नद्यांचे व काही भागात डबक्याचे स्वरूप आले आहे. समाधानाची बाब म्हणजे धरणे तुडूंब भरुन वाहत आहेत. वसईतील नवघर माणिकपूर भागात प्रामुख्याने उमेलमान, चुळणे भागात गुढगाभर पाणी साचले आहे. वसई गावात एस टी डेपो परिसर, किल्लाबंदर, पाचूबंदर तर तिकडे वासळई, तर्खड , निर्मळ तर पार्वती क्रॉस मधील मैदान पूर्ण स्विमिंग पूल झाले होते.यामध्ये वसई पूर्व भागातील सातिवली, गोखिवरे, महामार्ग भाग तर आद्योगिक वसाहतीत पाणी भरल्याने रविवारी कंपनीत जाणाºया कामगारांचे पूर्ण हाल झाले. याचा विपरीत परिणाम वसई पूर्व-पश्चिम वाहतुकीवर झाला. दुसरीकडे विरार मध्ये मुसळधार पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. ऐन पावसाळ्यात वसई सहित नालासोपारा विरार भागातील एस टी स्थानक व रेल्वे स्टेशन नजीक पाणी साचून राहत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या रस्त्यावर नोकरदार मंडळी, व्यापारी यांचे मात्र सतत पडणाºया पावसाने पुरते हाल केले होते. विरार मधील बºयाच ठिकाणी पश्चिम पट्टा, बोळींज, आगाशी पूर्व भागातील मनवेल पाडा, कारगिलनगर, मोरेगाव, एम बी इस्टेट, विवा कॉलेज परिसर आदी भाग संपूर्ण जलमय झाला होता.या ठिकाणी बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींनी शहर रचनेला फाटा दिल्याने जागोजागी पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे वसई आणि विरार च्या तुलनेत सर्वत अधिक पावसाचा फटका नालासोपाराभागाला बसतो. पूर्व सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी, तुळींज, टाकीपाडा, नालासोपारा बस आगार, संतोष भुवन, नागिनदास पाडा आदी वस्त्यांमध्ये पाणीच पाणी होते तर बहुतांशी लोकांच्या घरात पाणी शिरले होते. यामध्ये व्यापारी व त्यांची दुकाने, गोडावून यामधील वस्तू, फर्निचर आदींचे मोठे नुकसान झाल्याची ओरड ऐकावयास मिळाली. एकूणच शनिवार-रविवार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची फरफट वाचली.दरम्यान, शहरातुन होणारी रिक्षाची वाहतूक व दुचाकी यांना रविवारचा दिवसही डोके दुखीचा ठरला. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक खाड्या बंद पडल्या होत्या.विरारमधील पापडखिंड धरण ओव्हरफ्लोआधीच कमी पाणी साठवणुकीची क्षमता असलेले विरार नजीकचे पापडखिंड हे धरण दोन दिवस पडत असलेल्या पावसाने मात्र ओव्हरफ्लो होऊन वाहते आहे.दरवर्षी अगदी डिसेंबरमध्येच या धरणातील पाण्याची पातळी खाली जात असते. मात्र, या वर्षीपासून एक वेगळे तांत्रिक कारण देत महापालिकेने हे पापडखिंड धरण नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून बंद केले आहे.नवघर-वसई रोड बस आगारात तळेच तळेसालाबादप्रमाणेवसई रोड रेल्वे स्टेशनजवळील बस आगारात पावसामुळे मोठाले तळे झाले असून गुडघाभर पाण्यातून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे.त्यातच याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्थाच नसल्याने दरवर्षी पालिका व एस टी महामंडळ यांच्यात साफसफाईवरून वाद निर्माण होत असतो.मात्र तरीही या पाण्यातून वाट काढूंन लोकांना पुढे जावे लागते. ही परिस्थिती अशीच कायम आहे. या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस