शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

#Valentine special : जगाच्या नाकावर टिच्चून लग्न करणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी जोडप्याची कहाणी आवर्जून वाचा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 5:10 PM

'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत .

पुणे : 'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत. ही कहाणी आहे माधुरी सरोदे आणि जय शर्मा यांची. यातली माधुरी तृतीयपंथी आहे. त्यामुळे त्यांची कहाणी वेगळी ठरत नाही पण त्या दोघांनी अधिकृत आणि विधिवत लग्न करून आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातील पहिल्या तृतीयपंथी वैवाहिक जोडप्याचा मान या जोडप्याला मिळाला आहे. या जोडप्याची कथा एखाद्या चित्रपटासारखी उत्कंठावर्धक आहे.

            माधुरी पूर्वी अनेक स्टेज शो करायची. लावणी, कथक नृत्य हा तिचा हातखंडा. हे सर्व सुरु असताना सगळ्यांच्याप्रमाणे तिचेही फेसबुक अकाउंट होते. त्यातही तिने स्वतःची ओळख कधीही लपवली नाही. अचानक तिच्या इनबॉक्समध्ये महाराष्ट्र- गुजरात सीमेजवळ राहणाऱ्या जय शर्मा या तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती एक्सेप्ट केली आणि गप्पांचा सिलसिला सुरु झाला. एक दिवस त्याची परीक्षा घेण्यासाठी तिने त्याला मुंबईत बोलावलं आणि अवघ्या दोन तासात कशाचीही पर्वा न करता तो आला. फेसबुकावरची मैत्री बहरत होती आणि एक दिवस त्याने विचारलं ' आपण कायम सोबत राहू शकतो का ?' ती म्हणाली, ' हो पण अधिकृत लग्न करूनच ! त्याने  क्षणाचाही विचार केला नाही आणि म्हणाला 'हो करूया'

            लग्न करण्याचं तर ठरवलं पण बैठक चालली ती पाच तास. का लग्न करायचं आहे, ती तृतीयपंथी आहे, हा नॉर्मल आहे मग हे नातं कशासाठी असे हजारो सवाल समोर येत होते. त्याचे मित्र तर तूला मुली मिळतील मग एका हिजड्याशी लग्न कशासाठी असं समजावत होते. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. त्यामुळे अखेर सगळ्यांची समजूत काढत त्यांनी लग्न केलं आणि एक गोड प्रेमकहाणी अधिकृत झाली. लग्न झाल्यावर त्यांच्यावरची संकट संपली नव्हती. माधुरीचे सत्य जय यांच्या आईंना त्यांनी सांगितले नव्हते. जुन्या विचारात आणि वातावरणात वाढलेल्या त्या हे स्वीकारणार नाहीत म्हणून सारे साशंक होते. योग्य वेळी आणि सुरळीत संसार सुरु झाल्यावर त्यांना हे सांगू असे दोघांनी ठरवले पण लग्नाची बातमी जगभरातल्या माध्यमात प्रसिद्ध झाली आणि सत्य समोर आले. त्यानंतर सुमारे सहा महिने दोघेजण घरातल्यांसोबत संवादाचा प्रयत्न करत होते. हो- नाही करत अखेर तेही मानले आणि माधुरी शर्मांची सून झाली.           या सगळ्या घटनेला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. वरकरणी हे सोपं दिसत असलं तरी मानसिकता बदलवणं कठीण होत. या साऱ्या काळातून तावून सुलाखून निघालेले माधुरी आणि जय आता प्रचंड खुश आहेत. व्हॅलेंटाईन डे'वर बोलताना ते म्हणतात, 'आमच्यानंतर देशात आठ ओपन मँरेज झाली. तुम्ही प्रेम केल्यावर जात, धर्म, लिंग अशा गोष्टींना काही महत्व नसते. व्हॅलेंटाईन दिवस तर बहाणा आहे. प्रत्येक जोडप्याने रोजचा दिवस साजरा करण्याची गरज आहे. विशेषतः समाजाने स्वीकारले, प्रेम दिले तर कोणीही किन्नर भीक मागायला जाणार नाही'. 'एक दुजे के लिए' बनलेल्या या जोडप्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेTransgenderट्रान्सजेंडरmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट