शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

वाजपेयी पुण्यात सायकलवरून फिरायचे, जनसंघापासून पुण्याशी नाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 01:07 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आणि पुण्याचा स्नेहबंध खूपच जुना आहे. त्यांचे जनसंघाच्या कामासाठी पुण्यामध्ये अनेकदा येणे होई.

पुणे - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आणि पुण्याचा स्नेहबंध खूपच जुना आहे. त्यांचे जनसंघाच्या कामासाठी पुण्यामध्ये अनेकदा येणे होई. पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वैयक्तिक स्नेह होता. असेच ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आणि जनसंघाचे कार्यकर्ते अरविंद लेले यांच्याशी त्यांचा अत्यंत जवळचा स्नेह होता. जनसंघाची स्थापना झाल्यानंतर साधारणपणे १९५२ ते ५४ या कालावधीदरम्यान वाजपेयी जेव्हा जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा लेलेंसोबत सायकलवरून पुण्यातील कार्यकर्त्यांच्या घरी फिरायचे. मोतीबाग संघ कार्यालयाशेजारील सायकल दुकानामधून या सायकली भाड्याने घेतल्या जात. त्यांच्यामधील हाडाचा कार्यकर्ता या निमित्ताने पुणेकरांना अनेकदा अनुभवायला मिळाला.जनसंघाच्या कामासाठी लेले आणि वाजपेयी एकत्र फिरायचे. या संपर्कामधून त्यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता. वाजपेयी त्यांच्या घरी येऊन गेल्याचे लेले यांचे पुत्र मिलिंद व हेमंत यांनी सांगितले. अरविंद लेले विधानसभेच्या निवडणुकीला उभे असताना त्यांच्या प्रचारासाठी वाजपेयी आलेले होते. हा स्नेह वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतरही कायम होता. वाजपेयी पंतप्रधान असताना पुण्यात आलेले होते. ते काही काळ शासकीय विश्रामगृहावर थांबलेले होते. त्यावेळी लेले तेथे गेले. त्यांना सुरक्षारक्षक आत सोडत नव्हते. काही दिग्गज नेतेही तेथे उभे होते. तेव्हा लेले यांनी खिशातून एक चिठ्ठी काढून सुरक्षारक्षकाच्या हाती दिली. या चिठ्ठीवरून त्यांना तत्काळ आत सोडण्यात आले. लेले यांनी वाजपेयी पुण्यात येणार असल्याचे समजताच त्यांना वैयक्तिक पत्र पाठवून भेटीची वेळ आणि परवानगी घेतलेली होती.वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा नेमके लेलेंच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना कार्यक्रम पाहता येत नव्हता. त्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अवस्थेत वाजपेयींवर त्यांनी ‘उंच पर्वताची खोली अथांग आहे’ ही कविता रचली. तोंडी सांगितलेली ही कविता लेलेंच्या पत्नीने लिहून घेतली. तिसऱ्यांदा वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा लेले यांचा दुसरा मुलगा हेमंत यांचा विवाह होता. त्याच दिवशी वाजपेयींचा शपथविधी होता. गो. ल. आपटे सभागृहात विवाह सोहळा सुरू असताना त्यांनी हा सोहळा थांबविला. सभागृहातील टीव्हीवर सर्वांना शपथविधी पाहायला लावला.‘मेरी इक्यावन कविताएं’ या कवितासंग्रहाचा भावानुवाद केल्यावर त्याची प्रत वाजपेयींना पाठविण्यात आली. त्यांनी संमती दर्शविल्यानंतर ‘गीत नवे गातो मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आल्याची आठवण मिलिंद लेले यांनी सांगितली.रज्जूभय्यांच्या अंत्यविधीला पुण्यातराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक राजेंद्र सिंहजी ऊर्फ रज्जूभय्या यांचे पुण्यामध्ये १४ जुलै २००३ रोजी निधन झाले. ते पुण्यातील पर्वती जवळील कौशिक आश्रमामध्ये वास्तव्यास होते. त्यांची अंत्ययात्रा नवीन मराठी शाळा ते वैकुंठ अशी निघाली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयी यांनी पुण्यात आल्यावर मोतीबाग संघ कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी वैकुं ठ स्मशानभुमीला केवळ एकच प्रवेशद्वार होते. पंतप्रधान वाजपेयींच्या सुरक्षेच्यादृष्टिने विद्युत दाहिनीच्या बाजुला असलेले दुसरे प्रवेशद्वार रात्रीतूनच तयार करण्यात आले होते. याच प्रवेशद्वारातून ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आले होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPuneपुणे