शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

उत्तराखंड ढगफुटी; पुणे जिल्ह्यातील २४ पर्यटक सुखरूप, नातेवाइकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:48 IST

हे सर्व पर्यटक श्री भैरवनाथ विद्यालयातील १९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र आहेत. त्यांनी १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी उत्तराखंडला प्रयाण केले होते.

मंचर/अवसरी (पुणे) : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील २४ पर्यटक अडकले होते. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, बुधवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप असल्याचे समजताच नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक श्री भैरवनाथ विद्यालयातील १९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र आहेत. त्यांनी १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी उत्तराखंडला प्रयाण केले होते. बारकोट येथे मुक्काम केल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी ते उत्तरकाशीमार्गे गंगोत्री दर्शनासाठी गेले. ढगफुटीमुळे परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला आणि दूरसंचार यंत्रणा कोलमडल्याने त्यांच्याशी संपर्क तुटला होता. यामुळे काही काळ त्यांच्या सुरक्षिततेबाबत अनिश्चितता होती.

मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर सर्व २४ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळाली. तसेच, राज्याचे माजी सहकार मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी थेट संपर्क साधून मदतीची विनंती केली. उत्तराखंड प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्याशी सतत समन्वय ठेवून पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गंगोत्री परिसरातील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत. ढगफुटीमुळे वीज आणि संपर्क सुविधा खंडित झाल्याने काही काळ संभाषण अशक्य झाले होते, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे पर्यटक लवकरच महाराष्ट्रात सुखरूप परत येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अडकलेल्या पर्यटकांची नावे :

मंगल गडगे, अशोक किसन भोर, लीला रोकडे, माणिक ढोरे, मारुती शिंदे, समृद्ध जंगम, सतीश मांगडे, लीला जंगम, पुरुषोत्तम, संगीता वाळुंज, गहिणीनाथ शिंदे, अरुण सातकर, विठ्ठल खेडकर, सुनिता ढोरे, नितीन जाधव, बापू ठेंबेकर, सविता काळे, अशोक टेमकर, मंगल भेगडे, तुकाराम गावडे, मंदा वायाळ, उज्ज्वला पिंगळे, मंदा घाडगे, जनाबाई पवळे.

दरम्यान, नातेवाईक आणि गावकरी प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने या पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड