शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Heavy Rain: राज्यात अवकाळी पावसाने 'साडेतीन हजार' तर पुण्यात 'दोन हजारांहून' अधिक जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 20:36 IST

राज्यातील रायगड अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली

पुणे : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने ५ जिल्ह्यांमधील २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली. तिथे ३ हजार ५०० पेक्षा जास्त शेळ्यामेंढ्या पावसात भिजल्याने थंडीने गारठून मरण पावल्या आहेत. त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात पाऊस व थंडीने तब्बल 2 हजार 133 शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत.  शेळीमेंढी मालकांचे यात मोठेच नुकसान झाले. 

महाराष्ट्रात रायगड, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. पाऊस व त्यानंतरचा गारवा जनावरांना सहन झाला नाही. त्यातच या कालावधीत मेंढ्यांची लोकर काढण्यात येते. त्यामुळे त्यांना थंडी व पावसाचा जास्त त्रास झाला. २९ तालुके व १९९ गावांना हा फटका बसला. यातील बहुसंख्य ठिकाणी शेळ्यामेंढ्यांसाठी तात्पुरता निवारा केलेला असतो. मात्र पावसात तो टिकला नाही. जोराचा पाऊस असल्याने बांधलेली शेडही काही ठिकाणी पडून गेली व जनावरे उघडी पडली. थेट अंगावर पडलेला पाऊस त्यांना सहन झाला नाही. त्यातच नंतर सुटलेली थंडी त्यांच्या जीवावर बेतली आहे. 

पुणे जिल्ह्यात तब्बल 2 हजारखूनही अधिक जनावरे दगावली 

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना ऐन थंडीत गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस रात्री उशीरापर्यंत धो-धो कोसळत होता. पावसासोबतच प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने याचा फार मोठा फटका रानोमाळ फिरणाऱ्या मेंढपाळ व शेतक-यांना बसला. एकाच वेळी धुवाधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात तब्बल 2 हजार 133 शेळ्यामेंढ्या दगावल्या आहेत. यामध्ये 2 हजार 38 मेंढ्या, 86 शेळ्या, 6 गाय, एक म्हैस व 2 वासरे मृत्यू झाला. 

मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यायला हवी

''तंबू किंवा कनाती पक्क्या बांधणे गरजेचे असते. जनावरांना निसर्गाने पुरेशी संरक्षण व्यवस्था शरीरातच दिली आहे, मात्र काही वेळा ती टिकू शकत नाही. त्यामुळे जे हे प्राणी पाळतात, त्यांनीच अशा वातावरणात त्यांची काळजी घ्यायला हवी. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी तर यासंदर्भात विशेष दक्षता घ्यायला हवी असे पशूसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले आहे.''   

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीSocialसामाजिकFarmerशेतकरीGovernmentसरकार