शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Heavy Rain: राज्यात अवकाळी पावसाने 'साडेतीन हजार' तर पुण्यात 'दोन हजारांहून' अधिक जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 20:36 IST

राज्यातील रायगड अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली

पुणे : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने ५ जिल्ह्यांमधील २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली. तिथे ३ हजार ५०० पेक्षा जास्त शेळ्यामेंढ्या पावसात भिजल्याने थंडीने गारठून मरण पावल्या आहेत. त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात पाऊस व थंडीने तब्बल 2 हजार 133 शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत.  शेळीमेंढी मालकांचे यात मोठेच नुकसान झाले. 

महाराष्ट्रात रायगड, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. पाऊस व त्यानंतरचा गारवा जनावरांना सहन झाला नाही. त्यातच या कालावधीत मेंढ्यांची लोकर काढण्यात येते. त्यामुळे त्यांना थंडी व पावसाचा जास्त त्रास झाला. २९ तालुके व १९९ गावांना हा फटका बसला. यातील बहुसंख्य ठिकाणी शेळ्यामेंढ्यांसाठी तात्पुरता निवारा केलेला असतो. मात्र पावसात तो टिकला नाही. जोराचा पाऊस असल्याने बांधलेली शेडही काही ठिकाणी पडून गेली व जनावरे उघडी पडली. थेट अंगावर पडलेला पाऊस त्यांना सहन झाला नाही. त्यातच नंतर सुटलेली थंडी त्यांच्या जीवावर बेतली आहे. 

पुणे जिल्ह्यात तब्बल 2 हजारखूनही अधिक जनावरे दगावली 

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना ऐन थंडीत गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस रात्री उशीरापर्यंत धो-धो कोसळत होता. पावसासोबतच प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने याचा फार मोठा फटका रानोमाळ फिरणाऱ्या मेंढपाळ व शेतक-यांना बसला. एकाच वेळी धुवाधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात तब्बल 2 हजार 133 शेळ्यामेंढ्या दगावल्या आहेत. यामध्ये 2 हजार 38 मेंढ्या, 86 शेळ्या, 6 गाय, एक म्हैस व 2 वासरे मृत्यू झाला. 

मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यायला हवी

''तंबू किंवा कनाती पक्क्या बांधणे गरजेचे असते. जनावरांना निसर्गाने पुरेशी संरक्षण व्यवस्था शरीरातच दिली आहे, मात्र काही वेळा ती टिकू शकत नाही. त्यामुळे जे हे प्राणी पाळतात, त्यांनीच अशा वातावरणात त्यांची काळजी घ्यायला हवी. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी तर यासंदर्भात विशेष दक्षता घ्यायला हवी असे पशूसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले आहे.''   

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीSocialसामाजिकFarmerशेतकरीGovernmentसरकार