शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

Heavy Rain: राज्यात अवकाळी पावसाने 'साडेतीन हजार' तर पुण्यात 'दोन हजारांहून' अधिक जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 20:36 IST

राज्यातील रायगड अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली

पुणे : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने ५ जिल्ह्यांमधील २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली. तिथे ३ हजार ५०० पेक्षा जास्त शेळ्यामेंढ्या पावसात भिजल्याने थंडीने गारठून मरण पावल्या आहेत. त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात पाऊस व थंडीने तब्बल 2 हजार 133 शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत.  शेळीमेंढी मालकांचे यात मोठेच नुकसान झाले. 

महाराष्ट्रात रायगड, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. पाऊस व त्यानंतरचा गारवा जनावरांना सहन झाला नाही. त्यातच या कालावधीत मेंढ्यांची लोकर काढण्यात येते. त्यामुळे त्यांना थंडी व पावसाचा जास्त त्रास झाला. २९ तालुके व १९९ गावांना हा फटका बसला. यातील बहुसंख्य ठिकाणी शेळ्यामेंढ्यांसाठी तात्पुरता निवारा केलेला असतो. मात्र पावसात तो टिकला नाही. जोराचा पाऊस असल्याने बांधलेली शेडही काही ठिकाणी पडून गेली व जनावरे उघडी पडली. थेट अंगावर पडलेला पाऊस त्यांना सहन झाला नाही. त्यातच नंतर सुटलेली थंडी त्यांच्या जीवावर बेतली आहे. 

पुणे जिल्ह्यात तब्बल 2 हजारखूनही अधिक जनावरे दगावली 

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना ऐन थंडीत गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस रात्री उशीरापर्यंत धो-धो कोसळत होता. पावसासोबतच प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने याचा फार मोठा फटका रानोमाळ फिरणाऱ्या मेंढपाळ व शेतक-यांना बसला. एकाच वेळी धुवाधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात तब्बल 2 हजार 133 शेळ्यामेंढ्या दगावल्या आहेत. यामध्ये 2 हजार 38 मेंढ्या, 86 शेळ्या, 6 गाय, एक म्हैस व 2 वासरे मृत्यू झाला. 

मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यायला हवी

''तंबू किंवा कनाती पक्क्या बांधणे गरजेचे असते. जनावरांना निसर्गाने पुरेशी संरक्षण व्यवस्था शरीरातच दिली आहे, मात्र काही वेळा ती टिकू शकत नाही. त्यामुळे जे हे प्राणी पाळतात, त्यांनीच अशा वातावरणात त्यांची काळजी घ्यायला हवी. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी तर यासंदर्भात विशेष दक्षता घ्यायला हवी असे पशूसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले आहे.''   

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीSocialसामाजिकFarmerशेतकरीGovernmentसरकार