शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्यास अटकेसोबत होऊ शकतो दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:02 IST

विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो...

पिंपरी :रेल्वेने प्रवास करताना आपत्कालीन स्थिती ओढवल्यास साखळी ओढणे अपेक्षित असते. विनाकारण साखळी ओढली तर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात अटक आणि दंडदेखील होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण साखळी ओढणे महागात पडू शकते. रेल्वे प्रवासात हजारो प्रवासी एकावेळेस प्रवास करीत असतात. विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

साखळी ओढून रेल्वे थांबविल्याप्रकरणी मागील वर्षी पुणे स्थानकावर एसीपी (अलार्म चेन पुलिंग) च्या ९२९ घटना घडल्या होत्या. याप्रकरणी ८०३ प्रवाशांना आरपीएफकडून अटक करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत साखळी ओढली तर रेल्वे प्रशासन कारवाई करीत नाही. परंतु, विनाकारण साखळी ओढली किंवा किरकोळ कारणासाठी साखळी ओढली तर कारवाई करण्यात येते.

साखळी ओढल्यावर काय होते ?

साखळी ओढल्यावर रेल्वे इंजिनचे बीपी प्रेशर डाऊन होते. म्हणजेच बोगीच्या खालच्या पाईपमधून मोठा आवाज करून हवा बाहेर पडते. प्रेशर डाऊन होऊन गाडी थांबते. कोणत्या डब्यात साखळी ओढली आहे, हे समजण्यासाठी डब्यांच्या आत आणि बाहेर इंडिकेस्टस् लाल लाईट लागतो. याची माहिती रेल्वे चालकाला मिळते. गाडी सेक्शनमध्ये असेल तर सहायक रेल्वे चालक गार्ड हे कोचची पाहणी करतात. गाडी स्थानकावर असेल तर त्यावेळी आरपीएफकडून शोध घेतला जातो.

या कारणांसाठी साखळी ओढा

साखळी कधी ओढावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गाडीत आग लागली, किंवा डब्यातून धूर निघत असेल, एखादा प्रवासी दरवाजातून पडला असेल. तसेच कोणी खिडकीला लटकला असेल, कोणी रेल्वेखाली येत असेल, अशा आपत्कालीन स्थितीत साखळी ओढली पाहिजे.

गेल्या वर्षी ९०२ वेळा रेल्वे थांबली

गेल्या वर्षी ९०२ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली आहे. यात प्रवाशांनी दिलेले कारण रेल्वेला अमान्य झाल्याने प्रशासनाने प्रवाशाला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून जवळपास १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे