शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

खबरदार! रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्यास अटकेसोबत होऊ शकतो दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:02 IST

विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो...

पिंपरी :रेल्वेने प्रवास करताना आपत्कालीन स्थिती ओढवल्यास साखळी ओढणे अपेक्षित असते. विनाकारण साखळी ओढली तर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात अटक आणि दंडदेखील होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण साखळी ओढणे महागात पडू शकते. रेल्वे प्रवासात हजारो प्रवासी एकावेळेस प्रवास करीत असतात. विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

साखळी ओढून रेल्वे थांबविल्याप्रकरणी मागील वर्षी पुणे स्थानकावर एसीपी (अलार्म चेन पुलिंग) च्या ९२९ घटना घडल्या होत्या. याप्रकरणी ८०३ प्रवाशांना आरपीएफकडून अटक करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत साखळी ओढली तर रेल्वे प्रशासन कारवाई करीत नाही. परंतु, विनाकारण साखळी ओढली किंवा किरकोळ कारणासाठी साखळी ओढली तर कारवाई करण्यात येते.

साखळी ओढल्यावर काय होते ?

साखळी ओढल्यावर रेल्वे इंजिनचे बीपी प्रेशर डाऊन होते. म्हणजेच बोगीच्या खालच्या पाईपमधून मोठा आवाज करून हवा बाहेर पडते. प्रेशर डाऊन होऊन गाडी थांबते. कोणत्या डब्यात साखळी ओढली आहे, हे समजण्यासाठी डब्यांच्या आत आणि बाहेर इंडिकेस्टस् लाल लाईट लागतो. याची माहिती रेल्वे चालकाला मिळते. गाडी सेक्शनमध्ये असेल तर सहायक रेल्वे चालक गार्ड हे कोचची पाहणी करतात. गाडी स्थानकावर असेल तर त्यावेळी आरपीएफकडून शोध घेतला जातो.

या कारणांसाठी साखळी ओढा

साखळी कधी ओढावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गाडीत आग लागली, किंवा डब्यातून धूर निघत असेल, एखादा प्रवासी दरवाजातून पडला असेल. तसेच कोणी खिडकीला लटकला असेल, कोणी रेल्वेखाली येत असेल, अशा आपत्कालीन स्थितीत साखळी ओढली पाहिजे.

गेल्या वर्षी ९०२ वेळा रेल्वे थांबली

गेल्या वर्षी ९०२ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली आहे. यात प्रवाशांनी दिलेले कारण रेल्वेला अमान्य झाल्याने प्रशासनाने प्रवाशाला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून जवळपास १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे