शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

खबरदार! रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्यास अटकेसोबत होऊ शकतो दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:02 IST

विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो...

पिंपरी :रेल्वेने प्रवास करताना आपत्कालीन स्थिती ओढवल्यास साखळी ओढणे अपेक्षित असते. विनाकारण साखळी ओढली तर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात अटक आणि दंडदेखील होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण साखळी ओढणे महागात पडू शकते. रेल्वे प्रवासात हजारो प्रवासी एकावेळेस प्रवास करीत असतात. विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

साखळी ओढून रेल्वे थांबविल्याप्रकरणी मागील वर्षी पुणे स्थानकावर एसीपी (अलार्म चेन पुलिंग) च्या ९२९ घटना घडल्या होत्या. याप्रकरणी ८०३ प्रवाशांना आरपीएफकडून अटक करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत साखळी ओढली तर रेल्वे प्रशासन कारवाई करीत नाही. परंतु, विनाकारण साखळी ओढली किंवा किरकोळ कारणासाठी साखळी ओढली तर कारवाई करण्यात येते.

साखळी ओढल्यावर काय होते ?

साखळी ओढल्यावर रेल्वे इंजिनचे बीपी प्रेशर डाऊन होते. म्हणजेच बोगीच्या खालच्या पाईपमधून मोठा आवाज करून हवा बाहेर पडते. प्रेशर डाऊन होऊन गाडी थांबते. कोणत्या डब्यात साखळी ओढली आहे, हे समजण्यासाठी डब्यांच्या आत आणि बाहेर इंडिकेस्टस् लाल लाईट लागतो. याची माहिती रेल्वे चालकाला मिळते. गाडी सेक्शनमध्ये असेल तर सहायक रेल्वे चालक गार्ड हे कोचची पाहणी करतात. गाडी स्थानकावर असेल तर त्यावेळी आरपीएफकडून शोध घेतला जातो.

या कारणांसाठी साखळी ओढा

साखळी कधी ओढावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गाडीत आग लागली, किंवा डब्यातून धूर निघत असेल, एखादा प्रवासी दरवाजातून पडला असेल. तसेच कोणी खिडकीला लटकला असेल, कोणी रेल्वेखाली येत असेल, अशा आपत्कालीन स्थितीत साखळी ओढली पाहिजे.

गेल्या वर्षी ९०२ वेळा रेल्वे थांबली

गेल्या वर्षी ९०२ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली आहे. यात प्रवाशांनी दिलेले कारण रेल्वेला अमान्य झाल्याने प्रशासनाने प्रवाशाला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून जवळपास १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे