शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:58 IST

चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून पती- पत्नी दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले.

ठळक मुद्देरस्ता नसल्याने रोज अडचणीचा सामना करत नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरु

खेड : रेटवडी येथे चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दुचाकीसह पती- पत्नी पाण्यात पडून पत्नीचा बुडून दुर्दैवी मुत्यू झाला. पतीने पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल झाला. उज्वला राजेंद्र भगत (वय ३७, सध्या रा. राजगुरुनगर, मुळ गाव निमगाव खंडोबा ता. खेड ) असे मृत्यूमुखी पड़लेल्या महिलेचे नाव  आहे.  याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ६ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भगत दांपत्य हे  चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले. पती राजेंद्र यांने पत्नी उज्वला हिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यांचा प्रवाह जास्त असल्याने पती- पत्नी पाण्यात वाहून गेली. राजेंद्र भगत यांनी आरओरडा केला.त्यामुळे रेटवडी येथील स्थानिक नागरिक मदतीसाठी धाऊन आले. नागरिकांच्या मदतीने राजेंद्र भगत यांना वाचविण्यात यश आले. परंतू, पाण्याच्या प्रवाहात त्यांच्या पत्नी वाहत गेल्याने दुर्दैवी अंत झाला. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून अनेक दिवसांपासुन पाण्याचा विसर्ग सुरु असुन कालवा दुथडी भरुन वाहत आहे. चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजुने दळणवळणासाठी रस्ता आहे. या रस्त्यांचा वापर आजुबाजुच्या गावातील शेतकरी करत असतात. भगतवस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अशा अडचणीचा सामना करत येथील नागरिकांचा रोज जीवघेणा प्रवास सुरु असतो. या घटनेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्यामुळे भगतवस्ती रेटवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :KhedखेडPuneपुणेDamधरणDeathमृत्यू