शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी आले पाण्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:34 IST

उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.

भोर : उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला भागात भोर तालुक्यातील शिरगाव येथे नीरा नदीचा उगम आहे. धरण बांधण्याच्या आधी  नीरा नदीच्या दोन्ही बाजूंना अनेक गावे वसलेली होती. इतिहासात हिरडस मावळ या नावाने या गावांची सामूहिक ओळख होती. कोकणाला जोडणारा वरंध घाट या भागातून जातो. डोंगरात प्रामुख्याने हिरडा, आईन, शिसव, सागवान यांची झाडे अधिक आहेत. मात्र, हिरड्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ‘हिरडस मावळ’ नाव मिळाले असल्याचे येथील इतिहास संशोधक सुरेश शिंदे यांनी सांगितले.

सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाने नीरा नदीवर नीरा-देवघर धरण बांधले. त्यानंतर नीरा नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावातील नागरिक विस्थापित झाले. त्याच वेळी हिरडोस मावळातील महत्त्वाचे असलेले व्यापारी हिर्डोशी गावही विस्थापित झाले. नीरा-देवघर धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे धरणात गेलेले हिर्डोशी गाव जवळपास २० वर्षांनंतर पाण्याबाहेर आले आहे.  गावाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत. त्या काळातील डांबरी रस्ता आजही चांगल्या अवस्थेत आहे. विविध प्रकारचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले व्यावसायिक दुकानांचे जोते येथील वैभवशाली दुकानांची आठवण करून देतात. जि. प. शाळा, आरोग्य केंद्र, पीठगिरणी, पोलीस चौकी, ग्रामदैवत इत्यादीचे आवशेष आहेत. बसथांब्याजवळ दगडी शिळा असून त्यावर महाड २५ किलोमीटर असे लिहिलेले दिसत आहे. नवीन रस्त्यामुळे सध्याचे महाडचे अंतर वाढून ४५ किलोमीटर झाले आहे. स्थानिक नागरिक धरणात जाऊनही आमची शाळा, हा दवाखाना, हे माझे घर असे दाखवून कळत-नकळत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना नवीन गावात जरी पुनर्वसन झाले असले, तरी मातीत रुतलेल्या भावना कडूगोड आठवणी पाण्याखालीच राहिलेल्या आहेत. पडझड झालेले ग्रामदैवत शंभुमहादेवाचे पूर्वाभिमुखी मंदिर मंदिरातील शिवलिंग आहे. समोरील बाजूला काही शूरवीरांचे पराक्रम सांगणारे बºयाच वीरगळी या ठिकाणी आहेत. येथील पाण्याबाहेर आलेल्या सर्व बाबी आपल्या गतकाळातील वैभवाच्या आठवणी सांगत असून वैभवशाली हिर्डोशी आज येथील लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहत असल्याचे इतिहाससंशोधक सुरेश शिंदेयांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळ