शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी आले पाण्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:34 IST

उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.

भोर : उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला भागात भोर तालुक्यातील शिरगाव येथे नीरा नदीचा उगम आहे. धरण बांधण्याच्या आधी  नीरा नदीच्या दोन्ही बाजूंना अनेक गावे वसलेली होती. इतिहासात हिरडस मावळ या नावाने या गावांची सामूहिक ओळख होती. कोकणाला जोडणारा वरंध घाट या भागातून जातो. डोंगरात प्रामुख्याने हिरडा, आईन, शिसव, सागवान यांची झाडे अधिक आहेत. मात्र, हिरड्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ‘हिरडस मावळ’ नाव मिळाले असल्याचे येथील इतिहास संशोधक सुरेश शिंदे यांनी सांगितले.

सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाने नीरा नदीवर नीरा-देवघर धरण बांधले. त्यानंतर नीरा नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावातील नागरिक विस्थापित झाले. त्याच वेळी हिरडोस मावळातील महत्त्वाचे असलेले व्यापारी हिर्डोशी गावही विस्थापित झाले. नीरा-देवघर धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे धरणात गेलेले हिर्डोशी गाव जवळपास २० वर्षांनंतर पाण्याबाहेर आले आहे.  गावाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत. त्या काळातील डांबरी रस्ता आजही चांगल्या अवस्थेत आहे. विविध प्रकारचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले व्यावसायिक दुकानांचे जोते येथील वैभवशाली दुकानांची आठवण करून देतात. जि. प. शाळा, आरोग्य केंद्र, पीठगिरणी, पोलीस चौकी, ग्रामदैवत इत्यादीचे आवशेष आहेत. बसथांब्याजवळ दगडी शिळा असून त्यावर महाड २५ किलोमीटर असे लिहिलेले दिसत आहे. नवीन रस्त्यामुळे सध्याचे महाडचे अंतर वाढून ४५ किलोमीटर झाले आहे. स्थानिक नागरिक धरणात जाऊनही आमची शाळा, हा दवाखाना, हे माझे घर असे दाखवून कळत-नकळत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना नवीन गावात जरी पुनर्वसन झाले असले, तरी मातीत रुतलेल्या भावना कडूगोड आठवणी पाण्याखालीच राहिलेल्या आहेत. पडझड झालेले ग्रामदैवत शंभुमहादेवाचे पूर्वाभिमुखी मंदिर मंदिरातील शिवलिंग आहे. समोरील बाजूला काही शूरवीरांचे पराक्रम सांगणारे बºयाच वीरगळी या ठिकाणी आहेत. येथील पाण्याबाहेर आलेल्या सर्व बाबी आपल्या गतकाळातील वैभवाच्या आठवणी सांगत असून वैभवशाली हिर्डोशी आज येथील लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहत असल्याचे इतिहाससंशोधक सुरेश शिंदेयांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळ