शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी आले पाण्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:34 IST

उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.

भोर : उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला भागात भोर तालुक्यातील शिरगाव येथे नीरा नदीचा उगम आहे. धरण बांधण्याच्या आधी  नीरा नदीच्या दोन्ही बाजूंना अनेक गावे वसलेली होती. इतिहासात हिरडस मावळ या नावाने या गावांची सामूहिक ओळख होती. कोकणाला जोडणारा वरंध घाट या भागातून जातो. डोंगरात प्रामुख्याने हिरडा, आईन, शिसव, सागवान यांची झाडे अधिक आहेत. मात्र, हिरड्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ‘हिरडस मावळ’ नाव मिळाले असल्याचे येथील इतिहास संशोधक सुरेश शिंदे यांनी सांगितले.

सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाने नीरा नदीवर नीरा-देवघर धरण बांधले. त्यानंतर नीरा नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावातील नागरिक विस्थापित झाले. त्याच वेळी हिरडोस मावळातील महत्त्वाचे असलेले व्यापारी हिर्डोशी गावही विस्थापित झाले. नीरा-देवघर धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे धरणात गेलेले हिर्डोशी गाव जवळपास २० वर्षांनंतर पाण्याबाहेर आले आहे.  गावाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत. त्या काळातील डांबरी रस्ता आजही चांगल्या अवस्थेत आहे. विविध प्रकारचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले व्यावसायिक दुकानांचे जोते येथील वैभवशाली दुकानांची आठवण करून देतात. जि. प. शाळा, आरोग्य केंद्र, पीठगिरणी, पोलीस चौकी, ग्रामदैवत इत्यादीचे आवशेष आहेत. बसथांब्याजवळ दगडी शिळा असून त्यावर महाड २५ किलोमीटर असे लिहिलेले दिसत आहे. नवीन रस्त्यामुळे सध्याचे महाडचे अंतर वाढून ४५ किलोमीटर झाले आहे. स्थानिक नागरिक धरणात जाऊनही आमची शाळा, हा दवाखाना, हे माझे घर असे दाखवून कळत-नकळत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना नवीन गावात जरी पुनर्वसन झाले असले, तरी मातीत रुतलेल्या भावना कडूगोड आठवणी पाण्याखालीच राहिलेल्या आहेत. पडझड झालेले ग्रामदैवत शंभुमहादेवाचे पूर्वाभिमुखी मंदिर मंदिरातील शिवलिंग आहे. समोरील बाजूला काही शूरवीरांचे पराक्रम सांगणारे बºयाच वीरगळी या ठिकाणी आहेत. येथील पाण्याबाहेर आलेल्या सर्व बाबी आपल्या गतकाळातील वैभवाच्या आठवणी सांगत असून वैभवशाली हिर्डोशी आज येथील लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहत असल्याचे इतिहाससंशोधक सुरेश शिंदेयांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळ