शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात, ७ वर्षांत नीचांकी पातळी; १० फेब्रुवारीपासून शेतीचे पाणी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:48 IST

जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत...

कळस (पुणे) : पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी मृत साठ्यात गेले असून, २०१५ नंतर पहिल्यांदाच एवढ्या लवकर मृत साठ्यात धरण गेल्याने शेती सिंचनासाठी फेब्रुवारी महिन्यात १० तारखेला पाणी बंद केले जाणार आहे. त्यामुळे जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत आले आहे

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल महिन्यात मृत साठ्यात जात असते. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात मृतसाठा गाठला आहे. धरणात ६०.६६ टक्के पाणी पातळी झाली होती. रब्बी पिकांसाठी उजनीतून मुख्य कालवा, सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून तर सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. १२ ऑक्टोबर रोजी धरणात एकूण ९६.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सर्वांत जास्त मृतसाठा ६३.६६ टीएमसी असलेले उजनी धरण आहे.

३२ टीएमसी पाणी आतापर्यंत वापर झालेला आहे. उजनी धरणात सोमवारी २२ रोजी एकूण ६३.६६ टीएमसी व उपयुक्त साठा ०.०० टीएमसी झाला आहे. धरण २०१५-१६ मध्ये १४.६७ टक्के भरले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये फक्त ६०.६६ टक्के भरले होते. मात्र कालवा, नदी, बोगदा, सिंचन योजनांना दिलेल्या पाण्यामुळे उपयुक्त पाणीसाठा संपला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीनुसार

शेतीच्या सिंचनासाठी रब्बीतील शेवटचे आवर्तन १० फेब्रुवारीपर्यंत आहे. शेतीला सिंचनासाठी त्यानंतर पाणी दिले जाणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून मार्च व मे महिन्यांमध्ये पाणी सोडले जाणार आहे.

-रावसाहेब मोरे (कार्यकारी अभियंता, उजनी धरण)

 

टॅग्स :DamधरणSolapurसोलापूरOsmanabadउस्मानाबाद