शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात, ७ वर्षांत नीचांकी पातळी; १० फेब्रुवारीपासून शेतीचे पाणी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:48 IST

जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत...

कळस (पुणे) : पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी मृत साठ्यात गेले असून, २०१५ नंतर पहिल्यांदाच एवढ्या लवकर मृत साठ्यात धरण गेल्याने शेती सिंचनासाठी फेब्रुवारी महिन्यात १० तारखेला पाणी बंद केले जाणार आहे. त्यामुळे जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत आले आहे

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल महिन्यात मृत साठ्यात जात असते. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात मृतसाठा गाठला आहे. धरणात ६०.६६ टक्के पाणी पातळी झाली होती. रब्बी पिकांसाठी उजनीतून मुख्य कालवा, सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून तर सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. १२ ऑक्टोबर रोजी धरणात एकूण ९६.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सर्वांत जास्त मृतसाठा ६३.६६ टीएमसी असलेले उजनी धरण आहे.

३२ टीएमसी पाणी आतापर्यंत वापर झालेला आहे. उजनी धरणात सोमवारी २२ रोजी एकूण ६३.६६ टीएमसी व उपयुक्त साठा ०.०० टीएमसी झाला आहे. धरण २०१५-१६ मध्ये १४.६७ टक्के भरले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये फक्त ६०.६६ टक्के भरले होते. मात्र कालवा, नदी, बोगदा, सिंचन योजनांना दिलेल्या पाण्यामुळे उपयुक्त पाणीसाठा संपला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीनुसार

शेतीच्या सिंचनासाठी रब्बीतील शेवटचे आवर्तन १० फेब्रुवारीपर्यंत आहे. शेतीला सिंचनासाठी त्यानंतर पाणी दिले जाणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून मार्च व मे महिन्यांमध्ये पाणी सोडले जाणार आहे.

-रावसाहेब मोरे (कार्यकारी अभियंता, उजनी धरण)

 

टॅग्स :DamधरणSolapurसोलापूरOsmanabadउस्मानाबाद