शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:33 IST

शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे

पुणे : उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला. आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात या हल्ल्याचे त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शरद पवारांच्या घरावर हल्ला होणे हि अतिशय निंदनीय बाबा असल्याचे राजकीय नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच केंदीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या घटनेबाबत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले आहेत. पुण्यात बालगंधर्व येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

 आठवले म्हणाले, शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे. राज्य सरकारकडून एसटी कामगारांच्या आंदोलनाला चिघळवणाचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाला असं वळण देणं योग्य राहणार नाही. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका आठवले यांनी केली आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सेवा पुरवल्या आहेत. राज्य सरकारने आतातरी विलीनीकरणचा निर्णय घ्यावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. पगार मिळाला नाही. विलीनीकरण झाले तर खूप मोठी अडचण येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे 

मशिदवर भोंगे लावू नका ही भुमिका योग्य नाही 

राज ठाकरेंच्या भोंगे या प्रकरणाबाबत बोलताना आठवले म्हणाले, मी मनसेच्या भूमिकेशी सहमत नाही. त्यांनी भोंगे लावले म्हणून आम्ही भोंगे लावू हे योग्य नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेत मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायला बंदी नाही. पण मशिदवर भोंगे लावू नये ही भुमिका योग्य नाही. राज ठाकरे मोठे नेते आहेत. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे पण ते त्यांचे वारसदार नाहीत. उद्धव ठाकरे हे वारसदार आहेत. बाळासाहेब असते ते त्यांनी उद्धव ठाकरे यांना आघाडीसोबाबत जाऊ दिले नसते. उद्धव ठाकरेंनी त्यांचा विचार बदलावा. ते निर्णय बदलत नाहीत याचं वाईट वाटतं त्यांनी निर्णय बदलावा आणि आमच्या बरोबर सत्तेत यावं यासाठीही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसे