शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:33 IST

शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे

पुणे : उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला. आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात या हल्ल्याचे त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शरद पवारांच्या घरावर हल्ला होणे हि अतिशय निंदनीय बाबा असल्याचे राजकीय नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच केंदीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या घटनेबाबत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले आहेत. पुण्यात बालगंधर्व येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

 आठवले म्हणाले, शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे. राज्य सरकारकडून एसटी कामगारांच्या आंदोलनाला चिघळवणाचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाला असं वळण देणं योग्य राहणार नाही. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका आठवले यांनी केली आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सेवा पुरवल्या आहेत. राज्य सरकारने आतातरी विलीनीकरणचा निर्णय घ्यावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. पगार मिळाला नाही. विलीनीकरण झाले तर खूप मोठी अडचण येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे 

मशिदवर भोंगे लावू नका ही भुमिका योग्य नाही 

राज ठाकरेंच्या भोंगे या प्रकरणाबाबत बोलताना आठवले म्हणाले, मी मनसेच्या भूमिकेशी सहमत नाही. त्यांनी भोंगे लावले म्हणून आम्ही भोंगे लावू हे योग्य नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेत मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायला बंदी नाही. पण मशिदवर भोंगे लावू नये ही भुमिका योग्य नाही. राज ठाकरे मोठे नेते आहेत. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे पण ते त्यांचे वारसदार नाहीत. उद्धव ठाकरे हे वारसदार आहेत. बाळासाहेब असते ते त्यांनी उद्धव ठाकरे यांना आघाडीसोबाबत जाऊ दिले नसते. उद्धव ठाकरेंनी त्यांचा विचार बदलावा. ते निर्णय बदलत नाहीत याचं वाईट वाटतं त्यांनी निर्णय बदलावा आणि आमच्या बरोबर सत्तेत यावं यासाठीही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसे