शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांत केवळ दोन वेळ मंत्रालयात जाण्याचा उद्धव यांचा विक्रम- रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 19:25 IST

पुरंदर-हवेली शिवसेना शिंदे गटाच्या नूतन पदाधिकारी व जुने कार्यकर्ते यांचा नियुक्ती पत्र वाटप मेळावा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला...

सासवड (पुणे) : आयुष्यभर काँग्रेस विरोधात लढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेइमानी व गद्दारी करणारे उद्धव ठाकरे हे महत्त्वाकांक्षेपोटी २००९ मध्येच मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत होते. पण २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसशी लाचारी पत्करून मुख्यमंत्रिपदी अडीच वर्षे बसून केवळ दोन वेळा मंत्रालयात जाण्याचा विक्रमही केला. त्यामुळे त्याला चूलकोंबडा मुख्यमंत्री म्हणावे लागेल, अशी टीका शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी केली.

पुरंदर-हवेली शिवसेना शिंदे गटाच्या नूतन पदाधिकारी व जुने कार्यकर्ते यांचा नियुक्ती पत्र वाटप मेळावा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री राज्याचे सेना विभागीय प्रवक्ते विजय शिवतारे, राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे, पुणे जिल्हा महिला संघटक ममता लांडे-शिवतारे, जिल्हा सेनाप्रमुख दिलीप यादव, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, सचिव प्रवीण लोळे, रमेश इंगळे, भानुदास मोडक, नितीन कुंजीर, कपिल भाडळे, आदींसह दोन्ही तालुक्यांचे पदाधिकारी महिला व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी आता शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकली असून, संजय राऊत कधी शिवसेनेत आले आहेत हे मला आठवत नाही, असाही टोला लगावत कदम म्हणाले, वाघासारखी माणसे बाळासाहेबांना आवडत होती. त्यांना घरी बसविण्याचे पाप हे बापलेक करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री व निमंत्रक विजय शिवतारे, दिलीप यादव, राज्य महिला प्रवक्त्या ज्योती वाघमारे, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, डॉ. ममता लांडे व हवेली युवा समन्वयक यांची मनोगते व्यक्त झाली. माजी सभापती व जिल्हा प्रवक्ते अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

आम्ही कधी बाहेर जातोय याचीच वाट पाहिली

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी उद्धव यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना अनेक बैठकांची उदाहरणे दिली. मंत्री, आमदार, खासदार कार्यकर्ते यांना भेट टाळणारा मुख्यमंत्री मी पहिला नाही. पक्षांतर्गत नाराजीमुळे पक्ष फुटला हे बाळासाहेबांना कळले असते तर ते ५० आमदारांना आणायला गुवाहाटीला गेले असते. पण, बोलकी माणसे ठेवून, आम्ही कधी बाहेर जातोय यांची वाट पाहण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. आता महिला संघटन आणि त्यांच्या प्रतिष्ठेबाबत काम करावे लागेल. बचत गटांच्या महिला संघटित करून प्रत्येक महिन्यास वेळ देऊन त्यांचे प्रश्न, अडचणी याबाबत मीटिंग घ्यावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदम