शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

व्यावसायिक प्रवेशास बारावीचे ५० टक्के गुण ग्राह्य धरणार- उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:55 IST

बारावीच्या ५० टक्के व सीईटीच्या ५० टक्के गुणांच्या आधारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश...

पुणे : पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीच्या ५० टक्के व सीईटीच्या ५० टक्के गुणांच्या आधारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश दिले जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सांगितले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून हा निर्णय हाणून पाडला जाईल. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वायत्त महाविद्यालयांच्या संस्थाचालकांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. ते म्हणाले, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेची संख्या कमी करण्याबाबत शासनस्तरावर विचार केला जात आहे. इयत्ता बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना ५० टक्के महत्त्व दिले जाईल. सध्या सीईटी परीक्षेत प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे; परंतु पुढील वर्षी सीईटीच्या ५० टक्के गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला सीईटी परीक्षेत कमी गुण मिळाले, असे वाटत असल्यास त्यांच्यासाठी आठ ते दहा दिवसांनंतर आणखी एका सीईटी परीक्षा घेतली जाईल.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह इतर काही राज्यात इयत्ता बारावी व सीईटी या दोन्ही गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जात होते; परंतु याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. एचएससी, बीएससीई, आयसीएसई या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीत मिळालेले गुण समान पातळीवर आणण्याचे कोणतेही अचूक सूत्र अस्तित्वात नाही. त्यामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण एक समान पातळीवर आणणे शक्य नसल्याचे दिसून आल्याने सर्वोच्च न्यायालयाने केवळ सीईटी परीक्षेच्या आधारे प्रवेश करण्याचे आदेश दिले.

राज्य शासनाने बारावी आणि सीईटीच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असला तरी न्यायालयात हा निर्णय टिकणार नाही. त्यामुळे शासनाने या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक दुर्गेश मंगेशकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUday Samantउदय सामंत