शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात चक्री वादळाने घर पडून घडलेल्या दुर्घटनेत मायलेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:02 IST

मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत देऊ मिळवुन देणार माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन 

ठळक मुद्देखेड तालुक्यात झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व इमारती, मालमत्ताचे नुकसान

राजगुरुनगर: खेड तालुक्यात प्रश्चिम भागात चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या चक्रीवादळात वाहगाव (ता. खेड ) येथे घराच्या भिंतीखाली सापडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घर अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत पडुन मंजाबाई अनंता नवले (वय ६५ )यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा नारायण अनंत नवले (वय ३८) याचे गुरुवारी (दि. ४) सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी वहागाव येथे गुरुवारी दुपारी भेट देऊन या परिवाराचे सांत्वन केले.

      चक्री वादळाने नुकसान झालेल्या नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलुन केली आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ही मदत तातडीने मिळविण्यासाठी आग्रह धरणार आहोत.याशिवाय वहागाव(ता. खेड )येथे भिंत कोसळून मयत झालेल्या मायलेक अशा दोन व्यक्तींना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली आहे.ही शासकीय मदत देखील या कुटुंबातील वारसांना तात्काळ मिळवुन देऊ असा विश्वास माजी खासदार ,शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

खेड तालुक्यात झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व इमारती, मालमत्ताचे नुकसान झाले. तत्पूर्वी चाकण येथे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कर्त्या व्यक्तीची भेट घेऊन त्यांना २५ हजार रुपयांची मदत आढळराव पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यावेळी उपस्थित होते. जिल्हा माजी सभापती अरुण चांभारे, सुखदेव पानसरे आदींनी वहागाव आणि नुकसान ग्रस्त भागात नागरिकांची भेट घेऊन दिलासा दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेंकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी   भेट दिली. अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी आदेश दिले.

तालुक्यातील नुकसानीची पाहणी व पंचनामे करून नुकसान शेतकरी व नागरिकांना शासनाने मदत करावी.तालुक्यातील खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली. 

टॅग्स :KhedखेडShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावAccidentअपघातCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळDeathमृत्यू