शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या कसरतीचे '' ते '' बारा दिवस..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 19:03 IST

सुमारे ३०० अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी रात्रंदिवस मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

ठळक मुद्देनियंत्रण कक्षावर ताण

पुणे : रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी दगड-माती बाजूला करण्याचे आव्हान... मुसळधार पावसाने सतत दरडी कोसळण्याचा धोका... तर दुसऱ्या बाजुला दरी... पावसाने मार्ग खचलेला, रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झालेले... खानपानही वेळेत नाही... अशा अनंत अडचणींचा सामना करत तब्बल बारा दिवस रेल्वेचे सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी कर्जत-लोणावळादरम्यानच्या घाटात झटत होते. रात्रं-दिवस काम करून त्यांनी बंद पडलेली रेल्वेसेवा पुर्ववत केली. कर्जत ते लोणावळादरम्यान घाटात मंकी हिलजवळ दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. यावेळी सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. त्यापुर्वी या परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पण या घटनेने मध्य रेल्वेचे कंबरडे मोडले. दरडीमुळे पुणे व मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. दरडीने रेल्वेमागार्चे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसाने रेल्वेमार्ग खचला होता. सिग्नल यंत्रणेच बिघाड निर्माण झाला. मागार्खालील खडी वाहुन गेली होती. त्यामुळे दरड बाजूला करून रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे मोठे आव्हानात्मक काम रेल्वेवर होते. दोन-तीन दिवसांत हे काम पुर्ण होईल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांना होती. पण मुसळधार पाऊस थांबता-थांबत नसल्याने कामात अनेक अडचणी आल्या. अधून-मधुन ठिकठिकाणी माती व दगड मार्गावर येत होते. त्यामुळे रेल्वेपुढच्या समस्यांमध्ये भरच पडत चालली होती.याविषयी ह्यलोकमतह्णशी बोलताना मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार म्हणाले, जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळणे, भुस्खलन होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. रेल्वेमार्गाचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सुमारे ३०० अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी रात्रंदिवस मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. एका बोगद्याचे तर खुप नुकसान झाले होते. ते दुरूस्त करण्यासाठी काही वर्ष लागतील, असे कुणालाही वाटले असते. पण रेल्वेची यंत्रणा मोठी आहे. वेगवेगळ्या  मशिनच्या सहाय्याने काम करण्यात आले.मार्गाखालची माती वाहुन गेल्याने भराव टाकण्याचे काम कठीण होते. पावसाने त्यात खुप अडचणी आल्या. अभियांत्रिकी विभागातील काही अधिकारी तर पुर्ण १२ दिवस घाट परिसरातच राहायला होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना खानपानाची व्यवस्था केली जात होती. त्यासाठी रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा असते. सलग बारा दिवस परिश्रम केल्यानंतर शुक्रवारी वाहतुक सुरळीत झाली.

....

पुणे-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने यामार्गे जाणाºया अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. काही गाड्या अंशत: रद्द झाल्या. त्यामुळे इतर मार्गांवरही ताण आला. लांब पल्याच्या गाड्या विलंबाने धावत होत्या. पावसाने ठिकठिकाणचे मार्ग बंद पडल्याने सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली. त्यामुळे सर्व गाड्यांचे मार्ग, वेळा निश्चित करण्याचा ताण रेल्वेच्या नियंत्रण कक्षावर होता. या कक्षातील अधिकारी-कर्मचारी २४ तास कार्यरत राहून गाड्यांचे नियंत्रण करत होते.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासी