शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

उद्देशांशी गद्दारी केल्याने आपल्या देशातील बलिदाने व्यर्थ गेली : तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 13:24 IST

ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

पुणे : ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या व्यर्थ न हो बलिदान या चर्चा सत्रामध्ये गांधी बोलत होते. यावेळी, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, अमोल पालेकर आदी या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते.

तुषार गांधी यांच्या भाषणातील मुद्दे :- - बापूंना मारणाऱ्या शक्ती आपल्याला आज झुकवत आहेत. त्यामुळे बापूंचे बलिदान व्यर्थ जात आहे.

- मारणाऱ्यांमध्ये विचार करण्याची शक्ती नसते त्यामुळे ते गोळ्यांचा आधार घेतात. 

- आपल्याला प्रेरणा देणारी व्यक्ती गेल्यावर आपण कमकुवत होतो, त्यामुळे दरवर्षी आपल्याला त्यांच्या बलिदानाची आठवण करून द्यावी लागते. त्यामुळे आता व्यर्थ नही जाणे देंगे बलिदान अशी घोषणा आपण द्यायला हवी. 

- पाच वर्षे झाली दाभोलकरांचे मारेकरी शोधले नाही. या मारेकरांची लिंक ज्यांच्यापर्यंत आहे ती मिटवण्यासाठी हा पाच वर्षांचा काळ घेण्यात आला आणि आता आपल्यापर्यंत काही येणार नाही याची खात्री झाल्यावर काहींना अटक करण्यात येत आहे. त्यांना पुढे कदाचित पुराव्याअभावी सोडण्यात येईल. परंतु यांच्या मागे ज्या संस्था आहेत त्यांना समाजाने शिक्षा देण्याची गरज आहे. त्यांना बहिष्कृत करणे हीच त्यांची शिक्षा आहे. 

- सध्या प्रश्न विचारणाऱ्यांना मारण्याचे काम चालू आहे, प्रश्न विचारले की देशद्रोही ठरवले जात आहे. 

- आपल्याला या प्रवृतींविरोधात राग यायला हवा. परंतु आपला विरोध हा लोकशाही मार्गानेच असला पाहिजे. राग येणं चांगलं असलं तरी हा राग आपल्याला नियंत्रणात ठेवता आला पाहिजे. 

- संविधान जाळलं गेलं कारण त्या लोकांना संविधानाची भीती वाटते. देशाला वाचवायचं असेल तर हिंसेला हरवावं लागेल. 

- आपले विचार हे प्रखर व्हायला हवेत. नाहीतर आतापर्यंतची सर्व बलिदाने व्यर्थ जातील.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrimeगुन्हाCBIगुन्हा अन्वेषण विभाग