शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उद्देशांशी गद्दारी केल्याने आपल्या देशातील बलिदाने व्यर्थ गेली : तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 13:24 IST

ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

पुणे : ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या व्यर्थ न हो बलिदान या चर्चा सत्रामध्ये गांधी बोलत होते. यावेळी, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, अमोल पालेकर आदी या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते.

तुषार गांधी यांच्या भाषणातील मुद्दे :- - बापूंना मारणाऱ्या शक्ती आपल्याला आज झुकवत आहेत. त्यामुळे बापूंचे बलिदान व्यर्थ जात आहे.

- मारणाऱ्यांमध्ये विचार करण्याची शक्ती नसते त्यामुळे ते गोळ्यांचा आधार घेतात. 

- आपल्याला प्रेरणा देणारी व्यक्ती गेल्यावर आपण कमकुवत होतो, त्यामुळे दरवर्षी आपल्याला त्यांच्या बलिदानाची आठवण करून द्यावी लागते. त्यामुळे आता व्यर्थ नही जाणे देंगे बलिदान अशी घोषणा आपण द्यायला हवी. 

- पाच वर्षे झाली दाभोलकरांचे मारेकरी शोधले नाही. या मारेकरांची लिंक ज्यांच्यापर्यंत आहे ती मिटवण्यासाठी हा पाच वर्षांचा काळ घेण्यात आला आणि आता आपल्यापर्यंत काही येणार नाही याची खात्री झाल्यावर काहींना अटक करण्यात येत आहे. त्यांना पुढे कदाचित पुराव्याअभावी सोडण्यात येईल. परंतु यांच्या मागे ज्या संस्था आहेत त्यांना समाजाने शिक्षा देण्याची गरज आहे. त्यांना बहिष्कृत करणे हीच त्यांची शिक्षा आहे. 

- सध्या प्रश्न विचारणाऱ्यांना मारण्याचे काम चालू आहे, प्रश्न विचारले की देशद्रोही ठरवले जात आहे. 

- आपल्याला या प्रवृतींविरोधात राग यायला हवा. परंतु आपला विरोध हा लोकशाही मार्गानेच असला पाहिजे. राग येणं चांगलं असलं तरी हा राग आपल्याला नियंत्रणात ठेवता आला पाहिजे. 

- संविधान जाळलं गेलं कारण त्या लोकांना संविधानाची भीती वाटते. देशाला वाचवायचं असेल तर हिंसेला हरवावं लागेल. 

- आपले विचार हे प्रखर व्हायला हवेत. नाहीतर आतापर्यंतची सर्व बलिदाने व्यर्थ जातील.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrimeगुन्हाCBIगुन्हा अन्वेषण विभाग