शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भिस्त तीन पादचारी पुलांवर; प्रशासन पाहतेय दुर्घटनेची वाट, रोज २२० गाड्यांतून येतात अडीच लाख प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:45 IST

शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून दररोज २२० गाड्यांमधून अडीच लाख प्रवाशी ये-जा करीत असताना त्यांना केवळ तीन पादचारी पुलांवर अवलंबून राहावे लागत आहे.

पुणे : शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून दररोज २२० गाड्यांमधून अडीच लाख प्रवाशी ये-जा करीत असताना त्यांना केवळ तीन पादचारी पुलांवर अवलंबून राहावे लागत आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळी या पुलांवर मोठी गर्दी होऊन प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून एखादी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहिली जात आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संताप व्यक्त करत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर केवळ तीनच पादचारी पुल असल्याने त्यांच्यावर मोठा ताण पडत आहे. या पुलांचे रूंदीकरण तसेच नवीन पादचारी पुलांची उभारणी रेल्वे प्रशासनाकडून केली जाणे आवश्यक असताना त्याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.पुणे रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी मुख्य पादचारी पुल बांधला. त्यानंतरच्या १०० वर्षांमध्ये केवळ दोनच पादचारी पादचारी पुल बांधण्यात आले. दरम्यानच्या काळात स्थानकातून ये-जा करणाºया रेल्वे व प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.मुख्य पूल हा द्वितीय वर्गाच्या प्रवेशद्वारापासून राजा बहादूर मोतीलाल मिल रस्त्यापर्यंत जातो. त्याचाच वापर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. पार्सल आॅफिस शेजारील व सोलापूरच्या दिशेकडील पादचारी पुलाचा वापर त्या तुलनेत कमी होतो. त्यामुळे मुख्य पुलावर प्रचंड गर्दी होते. सकाळी ७ ते ९ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ दरम्यान लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थानकावर मोठ्या संख्येने येतात. एकाच वेळी हजारो प्रवाशी बाहेर पडण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करतात. बॅगा घेऊन चालण्याची प्रचंड मोठी कसरत प्रवाशांना करावी लागते. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्यासाठी कसरतच असते.लोकसंख्या वाढूनही पुलांची संख्या कमीचपिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची संख्याही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.रेल्वे स्थानकावरील अपुºया सोयी सुविधांमुळे मुंबईत प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तिच परिस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर आहे. इथे कधीही मोठी दुर्घटना घडू शकेल. अनेक दिवसांपासून पादचारी पुलांचे रूंदीकरण व नवीन पुलांची उभारणी करण्याची मागणी प्रवाशी संघाच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्यासाठी रेल्वेच्या पादचारी पुलांवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे तसेच वरून खाली उडी मारण्याची आवश्यकता भासल्यास जवळ पॅराशुट बाळगावा. - हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवाशी संघपुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशांची संख्या, त्यासाठी उपलब्ध असणारे पादचारी पुल यांचा सर्व्हे करून त्यामध्ये काय सुधारणा करता येतील, याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या सर्व्हेच्या अहवालानुसार बदल घडवून आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडेही त्याबाबतच्या मागण्या ठेवल्या जातील.- अनिल शिरोळे, खासदारपुणे रेल्वे स्थानकावर एकाचवेळी मुंबई, सोलापूरच्या दिशेने दोन गाड्या आल्या, त्याचवेळी लोकलही आली. त्यावेळी पादचारी पुलांवर प्रचंड गर्दी होऊन मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नवीन पादचारी पुल उभारण्याची वेळोवेळी मागणी पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये करण्यात आली आहे. नवीन पुलाची उभारणी होईपर्यंत किमान रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवले जावे.- विकास देशपांडे,अध्यक्ष, दौंड-पुणे प्रवासी संघरेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी पादचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारामध्ये मोठ्या प्रमाणात हॉकर्सकडून अतिक्रमण झाले आहे. याकडे पोलीस, रेल्वे प्रशासन यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.- माणिक बिर्ला,अध्यक्ष, रेल्वे ट्रॅव्हल्स एजंट सर्व्हिसरेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षितेला प्राधान्य द्यावे. मुंबईमध्ये झालेली चेंगराचेंगरीची घटना पुन्हा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. पायाभूत व्यवस्था योग्य करण्यावर भर देण्यात यावा. - वंदना चव्हाण, खासदाररेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांचे दुर्लक्षपादचारी पुलांवर सायंकाळी व सकाळच्यावेळी मोठीगर्दी होते. त्यावेळी तिथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांनीही गर्दीच्या वेळी रांगेने पुढे सरकणे, ढकला ढकली न करणे, उशीर होत असला तरी घाई न करणे आदींची काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे