शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

तुटलेल्या संसारामुळे दुरावलेल्या चिमुरड्यांसाठी तडफड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 03:53 IST

दिवाळीला तरी घरी नेऊ देण्यासाठी आर्त अर्ज; काही दिवसांपुरता तरी ताबा देण्याची मागणी

पुणे : तुटलेल्या संसाराचे दु:ख सहन केले; पण दिवाळीच्या चाहुलीने दुरावलेल्या दिव्यांच्या आठवांनी ते आणखी गहिरे झाले आहे. त्यामुळे तब्बल ६० पालकांनी काही दिवसांपुरता मुलांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. यामध्ये बहुतांश वडील आहेत.ज्या दांपत्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा नांदण्यावरून भांडणे होत आहे, त्यांच्या मुलांचा ताबा आई किंवा वडिलांकडे देण्यात येतो. ज्यांच्याकडे मुलांचा ताबा आहे ते पालक आयुष्यातील सुख-दु:खाचे क्षण मुलांबरोबर घालवत असतो. मुले लहान असतील तर शक्यतो त्यांचा ताबा आईकडे देण्यात येतो. अशा परिस्थितीत मुलांच्या वडिलांना त्यांचा ताबा पाहिजे असेल तर त्यांना हिंदू विवाह कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करण्याची मुभा आहे.आईदेखील अशा प्रकारचा अर्ज करू शकते. या कायद्यांतर्गत दिवाळीच्या सुटीसाठी काही दिवस मुलांचा ताबा मिळावा, यासाठी तब्बल ६० आई-वडिलांनी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. मुलांना किती दिवस सुटी आहे, त्यांची आई किंवा वडिलांकडे जाण्याची इच्छा आहे का?, ज्याला ताबा देण्यात येणार आहे ती व्यक्ती त्यांचा सांभाळ करू शकते का? मुलांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे का? ताबा दिल्यानंतर मुलांच्या जिवाला काही धोका तर नाही ना? या बाबींचा विचार करून न्यायालयात ठराविक काळासाठी ताबा देण्याचा निर्णय देत असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी पालक न्यायालयात अर्ज करतात, अशी माहिती न्यायालय प्रशासनाकडून देण्यात आली.आईवडिलांचा घटस्फोटाचा खटला सुरू असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर मुले एका पालकाकडे राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांना आई-वडिलांचा एकत्र सहवास लाभणे कठीण असते. कधी-कधी तर मुलांचीदेखील इच्छा असते की, त्यांनी आपल्या आईला किंवा वडिलांना भेटावे. मात्र, आई वडिलांच्या वादामुळे त्यांना कोणातरी एकाकडेच थांबावे लागते. अशा पालक व मुलांची भेट व्हावी, म्हणून कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. ताबा मिळाल्यानंतर मुले २४ तास आई किंवा वडिलांच्या सहवासात असतात.ताब्यात असताना मुलांना काही होणार नाही, याची मात्र त्यांना काळजी घ्यावी लागते. ताब्यात असताना त्यांना काही झाले तर दिलेली मुदत त्वरित रद्द करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये तर आई किंवा वडिलांना त्यानंतर कधीच ताबा देण्यात आलेला नाही, अशी माहिती अ‍ॅड. माधवी परदेशी यांनी दिली.समेट घडविण्याचा प्रयत्न...घटस्फोटाचा दावा दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये देखील मुलांचा ताबा मागितला जातो. अशा वेळी आई किंवा वडिलांना मुले राहत असलेल्या घरात जाऊन त्यांना भेटण्याचे आदेश देण्यात येतात. काही प्रकरणांत ते बगिच्यात देखील भेटू शकतात. मात्र सध्या जी व्यक्ती त्यांना सांभाळत आहे त्याने तेथे उपस्थित राहणे ही गरजेची अट आदेशात ठेवण्यात येते. त्यामुळे मुलांच्या निमित्ताने आई-वडीलदेखील भेटतात. अशा वेळी मुलांच्या भविष्याचा विचार करीत त्यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे, असे अ‍ॅड. ज्योती जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप