शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पुण्यात तिहेरी हत्याकांड: प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेह जाळले पण एका धाग्यावरून गूढ उकललं

By किरण शिंदे | Updated: June 7, 2025 18:31 IST

- तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे.

रांजणगाव (ता. शिरूर) - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका २५ वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्या मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.अशात आज पुणे ग्रामीण जिल्हा पोलिसांनी एका अत्यंत गूढ हत्याकांडाचा छडा लावत मोठी कामगिरी केली आहे. तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीसह गुन्ह्याचे धागेदोरे सुस्पष्ट केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ मे २०२५ रोजी रांजणगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या एका शेताच्या हद्दीत एका महिलेसह दोन मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. या भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग मिळाला.यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला आहे. पोलिसांनी मृत महिला आणि दोन्ही मुलांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, व साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम हाती घेतले. यामध्ये मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय ३५, रा. वाशी, ता. माजलगाव, जि. बीड) असल्याचे निष्पन्न झाले. स्वाती ही बीड जिल्ह्यातील असून तिच्या दोन मुली – स्वराली (वय २ वर्षे) आणि विराज (वय ८ वर्षे) यांच्यासह ती पुण्यात आली होती. पोलिस तपासात उघड झाले की, स्वाती आणि आरोपी गोरख पोपट बांगरे (रा. शिरूर तालुका) यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते.अधिकच्या माहितीनुसार, स्वाती हिचा खून केल्यावर तिच्या मुलांनाही गोरखने ठार मारले आणि तिघांचेही मृतदेह दुर्गम भागात टाकून दिले. त्यानंतर आरोपी गोरखने घटनास्थळी पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लागला.गोरख बांगरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास साळुंके, सहाय्यक फौजदार गुलाबराव निमसे, बिट अंमलदार फुलराव यांच्या सहकार्याने करण्यात आला. दरम्यान, गोरख पोपट बांगरे याने स्वातीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि संशयाच्या भरात त्याने इतका टोकाचा निर्णय घेतला. पोलिस तपासात पुढे उघड झाले की, घटनेनंतर आरोपीने आपल्या घरात कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती आणि तो शांतपणे वावरत होता.तत्पूर्वी,पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या प्रभावी नेतृत्वात पुणे ग्रामीण पोलिसांनी या अत्यंत क्लिष्ट खुनाच्या घटनेचा पर्दाफाश केला. पुणे ग्रामीण पोलिस दलाने दाखवलेली तत्परता आणि सखोल तपासामुळे एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी