शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

पुण्यात तिहेरी हत्याकांड: प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेह जाळले पण एका धाग्यावरून गूढ उकललं

By किरण शिंदे | Updated: June 7, 2025 18:31 IST

- तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे.

रांजणगाव (ता. शिरूर) - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका २५ वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्या मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.अशात आज पुणे ग्रामीण जिल्हा पोलिसांनी एका अत्यंत गूढ हत्याकांडाचा छडा लावत मोठी कामगिरी केली आहे. तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीसह गुन्ह्याचे धागेदोरे सुस्पष्ट केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ मे २०२५ रोजी रांजणगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या एका शेताच्या हद्दीत एका महिलेसह दोन मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. या भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग मिळाला.यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला आहे. पोलिसांनी मृत महिला आणि दोन्ही मुलांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, व साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम हाती घेतले. यामध्ये मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय ३५, रा. वाशी, ता. माजलगाव, जि. बीड) असल्याचे निष्पन्न झाले. स्वाती ही बीड जिल्ह्यातील असून तिच्या दोन मुली – स्वराली (वय २ वर्षे) आणि विराज (वय ८ वर्षे) यांच्यासह ती पुण्यात आली होती. पोलिस तपासात उघड झाले की, स्वाती आणि आरोपी गोरख पोपट बांगरे (रा. शिरूर तालुका) यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते.अधिकच्या माहितीनुसार, स्वाती हिचा खून केल्यावर तिच्या मुलांनाही गोरखने ठार मारले आणि तिघांचेही मृतदेह दुर्गम भागात टाकून दिले. त्यानंतर आरोपी गोरखने घटनास्थळी पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लागला.गोरख बांगरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास साळुंके, सहाय्यक फौजदार गुलाबराव निमसे, बिट अंमलदार फुलराव यांच्या सहकार्याने करण्यात आला. दरम्यान, गोरख पोपट बांगरे याने स्वातीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि संशयाच्या भरात त्याने इतका टोकाचा निर्णय घेतला. पोलिस तपासात पुढे उघड झाले की, घटनेनंतर आरोपीने आपल्या घरात कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती आणि तो शांतपणे वावरत होता.तत्पूर्वी,पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या प्रभावी नेतृत्वात पुणे ग्रामीण पोलिसांनी या अत्यंत क्लिष्ट खुनाच्या घटनेचा पर्दाफाश केला. पुणे ग्रामीण पोलिस दलाने दाखवलेली तत्परता आणि सखोल तपासामुळे एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी