शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

‘सरल’चा खडतर मार्ग; तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 15:53 IST

‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना आधीच आधार सक्ती केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता भारनिमनाची भर पडली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकवर्ग त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देराज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्व माहिती ‘सरल’ संगणकप्रणालीच्या माध्यमातील संकलित केली जात आहे.‘सरल’चे संकेतस्थळ सातत्याने हँग होत आहे तसेच इतर अडचणी येत आहेत.

पुणे : ‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना आधीच आधार सक्ती केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता भारनिमनाची भर पडली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकवर्ग त्रस्त झाला आहे. एकीकडे माहिती भरण्यात येणार्‍या अडचणी आणि दुसरीकडे कमी विद्यार्थी संख्या दिसल्यास अतिरिक्त ठरण्याची भीती अशी टांगती तलवार या शिक्षकांवर आहे. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्व माहिती ‘सरल’ संगणकप्रणालीच्या माध्यमातील संकलित केली जात आहे. त्याआधारे शिक्षकांची संचमान्यताही केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सर्व शाळांमधील शिक्षक ही माहिती भरण्यात व्यस्त आहेत. यावर्षी आधार कार्डची माहिती भरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सुरूवातीला ही माहिती भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत ५ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पण अडथळे दुर न झाल्याने सर्व शाळांची माहिती भरून झाली नाही. परिणामी पुन्हा एकदा १३ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही ‘सरल’चे संकेतस्थळ सातत्याने हँग होत आहे तसेच इतर अडचणी येत आहेत. त्यातच आता भारनियमनाची भर पडल्याने या मुदतीतही काम पुर्ण होणार नाही, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने ‘आधार’मधील माहिती ‘सरल’मध्ये भरणे, बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळेतील नोंद वही व आधारवरील माहितीमध्य तफावत आढळून येत आहे. परिणामी माहिती भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून भारनियमन वाढविल्याने त्याचाही फटका बसू लागला आहे. पुणे जिल्हा विनानुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गवारी म्हणाले, आधारबरोबरच आता भारनियमनाचा फटका बसु लागला आहे. दिवसभर संकेतस्थळ सातत्याने हँग होते. तर सायंकाळच्या वेळी अनेकदा भारनियमनाला सामोरे जावे लागते. अनेक भागात दिवसाही भारनियमन होते. याचा फटका ग्रामीण भागाला अधिक प्रमाणात बसत आहे. त्यामुळे शिक्षकांना रात्रीच्या वेळीही आता काम करावे लागत आहे. त्यामुळे वाढविलेल्या मुदतीतही विद्यार्थ्यांची माहिती भरून होणार नाही.

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थीTeacherशिक्षक